आर्थिककृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

अखेर ऐतिहासिक निरा-देवधर निविदा प्रसिद्ध झाली – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण (बारामती झटका)

फलटण तालुक्यातील जनतेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, लतीफ तांबोळी, मनोज कांबळे पाटील आदी उपस्थित होते.

फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा-देवधर प्रकल्पात 40 वर्षांपासून तालुक्याच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले आहे. असा हा महत्त्वाकांक्षी निरा-देवधर प्रकल्प आहे‌. आज निरा-देवधर प्रकल्पाच्या ब्रांच कॅनॉलची निविदा प्रसिद्ध झाली. हे काम १२०० mm व व्यासाच्या सिमेंट काँक्रेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे होणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा तालुक्यातील ९ व फलटण तालुक्यातील २० गावांना पाणी मिळणार आहे. तसेच दर महिन्याला आवर्तन मिळणार असून या फलटण तालुक्यातील पाडेगाव, कोरेगाव, शिंदे मळा, तरडगाव, माळवाडी, कुसुर, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, डोंबाळवाडी, तडवळे, काळज, खामगाव, मुरूम, सुरवडी, निंभोरे, भैलकटी, वडजल, चौधरवाडी या गावातील लोकांना याचा फायदा होईल. तसेच उर्वरित गावाची लवकरच निविदा निघणार आहे. माझ्या व तालुक्याच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील गावांना याचा लाभ होणार आहे. गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. परंतु, मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळाचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली‌. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही.

खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील इंच ना इंच जमीन भिजवण्याचे हे स्वप्न मी पाहिलं होतं. ते आज राज्य सरकारने पूर्ण केल्याने आम्हाला आनंद होत आहे. या तालुक्यातील धोम बलकवडी चार मायी वरून आता तो बारा माया होणार. तसेच या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहणार आहे. भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई, पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही‌‌. शेतीबरोबरच व्यवसाय सुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील हरितक्रांती बरोबरच आर्थिक क्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर शेतीबरोबरच युवकांचे हाताला काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button