आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयात पाच अनुभवी अधिकाऱ्यांची शासनाकडून नियुक्ती….

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव डॉक्टर उर्मिला जोशी यांनी पंढरपूर येथे आषाढी वारीचे नियोजन केले आहे. आषाढी वारीच्या दरम्यान वारकरी व पालखीच्या सुरक्षिततेसाठी व संविधानासाठी पंढरपूर येथे आरोग्य स्वच्छता आपत्ती व्यवस्थापन संतुलित नियोजन व समन्वय गरजेचे असल्याने क्षेत्रातील कार्य अंमलात आणण्यासाठी अनुभव, कौशल्य व जबाबदारी घेण्यास समर्थ असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद धाराशिव श्री. मनोज राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद लातूर श्री. बाळासाहेब वाघ, उपसंचालक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग पुणे श्री. प्रशांत काळे, जिल्हा समन्वयक नरेगा जिल्हा परिषद धाराशिव श्री. आनंद मिरगणे व गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस श्री. रघुनाथ पांढरे अशा पाच अधिकाऱ्यांची शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांनी केलेल्या विनंतीनुसार आषाढी वारी 2025 साठी दि. 27 जून 2025 ते 7 जुलै 2025 या कालावधीसाठी सदरच्या नियुक्ती केलेल्या आहेत.

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची पंचायत समिती वाळवा, जि. सांगली येथे बदली झालेली आहे. परंतु, त्यांना आषाढी वारी झाल्यानंतर सोडले जाणार आहे. माळशिरस तालुक्यात गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आषाढी वारीचे नियोजन उत्तम प्रकारे सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.