मतासाठी, स्वार्थासाठी अनेकजण पावसात भिजतात मात्र देशासाठी, जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी पावसात भिजणारा संघर्ष योद्धा राम सातपुते एकमेव ठरले…

देशप्रेमी संघर्षयोद्धा मा. आ. राम सातपुते पावसात भिजले मात्र, दारे खिडक्या लावून घरामध्ये बसणाऱ्यांना थंडीची हुडहुडी भरली.
अकलूज (बारामती झटका)
ऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील देशप्रेमी यांच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज, ता. माळशिरस येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. शहीद जवान व सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याकरता वरूण राजाने सुद्धा हजेरी लावली होती. भर पावसामध्ये तिरंगा रॅली जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये निघाली होती. तिरंगा रॅलीतील सर्व देशप्रेमी पावसामध्ये भिजले होते. समाजामध्ये आपण मतासाठी, स्वार्थासाठी अनेकजण पावसात भिजलेले पाहिले आहेत, मात्र देशासाठी, जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी पावसात भिजणारा देशप्रेमी संघर्षयोद्धा लोकप्रतिनिधी माजी आमदार राम सातपुते एकमेव ठरलेले आहेत.

भारताचे विकासपुरुष व कणखर नेतृत्व असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी यशस्वी कामगिरी करून देशाची मान उंचावलेली आहे. यामध्ये अनेक जवान शहीद झालेले आहेत. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या रॅलीमध्ये आजी-माजी सैनिक, नगर पंचायतीचे आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, इंजिनीयर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, शेतकरी, विविध पक्षाचे राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी व शाखेचे शाखा अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात सदुभाऊ चौक, गांधी चौक मार्गे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सांगता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदुभाऊ चौकापासूनच वरूण राजाने हजेरी लावलेली होती. भर पावसात उत्साहामध्ये देशप्रेमी यांनी रॅलीमध्ये तिरंगे झेंडे हातामध्ये घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्यांचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद, अशा घोषणाने अकलूज परिसर दणाणून सोडला होता. देशप्रेमी संघर्षयोद्धा राम सातपुते यांच्या घोषणाबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले होते. भर पावसामध्ये वरूण राजाचा सन्मान करत शहीद जवान व जवानांच्या शौर्याला सलाम करत निघालेल्या भव्य तिरंगा यात्रेत संघर्षयोद्धा राम सातपुते भिजले मात्र, दारे, खिडक्या लावून घरामध्ये बसलेल्यांना थंडीची हुडहुडी भरली.

प्रस्थापितांनी सत्तर वर्षांमध्ये देशासाठी लढणाऱ्या जवानांचा सन्मान केलेला नाही, अशी भव्य तिरंगी यात्रा निघालेली होती. भव्य तिरंगा यात्रेचे बारामती झटका यूट्यूब चॅनलचे थेट प्रक्षेपण हजारो माता, माऊल्या, शहीद जवानांच्या आई, पत्नी व देशाच्या सीमेवर लढत असणाऱ्या जवानांच्या माता, भगिनी घरी बसून पहात होत्या. तिरंगा यात्रेच्या मार्गावरील दूतर्फा लोकांनी गॅलरी, पोर्च येथून तिरंगा यात्रेचा आनंद घेऊन संघर्षयोद्धा राम सातपुते तुमचा संघर्ष असाच चालू राहू द्या, आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी राहतील, असा संदेश देण्यासाठी हजारो लोक दुतर्फा तिरंगा यात्रा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली. उपस्थितांना देशप्रेमी संघर्षयोद्धा राम सातपुते यांनी भव्य तिरंगा यात्रेतील हजारो देश प्रेमींना संबोधित केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.