Uncategorizedताज्या बातम्या

उषाताई देवकर यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 26/2/2023 रोजी ऑनलाइन परीक्षेत प्रवेशासाठी कागदपत्रांची योग्य प्रकारे पडताळणी न करता आणि विवाह प्रमाणपत्र पडताळणी न करता परीक्षा प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उषाताई अर्जुन देवकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲड. शंकर एम. काटकर यांचेवतीने रीट याचिका दाखल केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button