Uncategorizedताज्या बातम्याराजकारणसामाजिक

रामभाऊ यांच्या एमआयडीसीतील उत्पादित माल रणजीतदादांच्या रेल्वेने जगाच्या बाजारात जाणार….

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीचा माळशिरस तालुक्याला फायदा होणार…

माळशिरस (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी इंग्रज कालीन रखडलेल्या लोणंद फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून रखडलेला रेल्वेचा मार्ग कागदावरून रुळावर आणण्याकरिता माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी उद्योग उदय सामंत यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या अथक प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील जनतेचे अपुरे असणारे स्वप्न पूर्णत्वास नेलेले आहे. रामभाऊ यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या एमआयडीसीतील उत्पादित माल रणजीतदादांच्या प्रयत्नातून इंग्रज काळापासून प्रलंबित असणाऱ्या लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेने जगाच्या बाजारात उत्पादित माल जाणार असल्याने उद्योग, व्यवसायीक, व्यापारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या केंद्रातील व राज्यातील सरकारने रस्त्याचे जाळे विणलेले आहे. माळशिरस तालुक्यात इंग्रजकालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग प्रलंबित होता. सदरच्या रेल्वे मार्गाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रश्न निकाली काढलेला असून सध्या सर्वे होऊन अंतिम टप्प्यामध्ये रेल्वेचे काम आलेले आहे. माळशिरस तालुक्यातील तरुण वर्गांच्या हाताला काम पाहिजे. छोटे-मोठे उद्योग तालुक्यामध्ये झाले पाहिजेत. तालुक्यातील अनेक युवक आसपासच्या तालुक्यामध्ये एमआयडीसीत कामाला जात असतात. यासाठी लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून येळीव येथे एमआयडीसी मंजूर केलेली आहे.

एमआयडीसी मुळे माळशिरस तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. तरुण वर्गांच्या हाताला काम मिळणार आहे. उद्योग, व्यापारी, व्यावसायिक यांच्या मोठ्या उद्योगाला चालना मिळणार आहे. माळशिरस तालुक्यामध्ये रस्ते, लाईट, वीज, पाणी मुबलक आहे. तरीसुद्धा गेल्या ७० वर्षापासून माळशिरस तालुक्यात एमआयडीसी संकल्पना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी राबवलेली नव्हती. पहिल्यांदाच लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला होता. योगायोगाने देवेंद्र फडवणीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या मागणीला यश आले.

विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी सुद्धा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे काम सुरू होते. अनेक ठिकाणी भाषणांमध्ये माळशिरस तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करणार असल्याचे वेळोवेळी सांगत होते. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’ या म्हणीचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील जनतेला आलेला आहे. लवकरच माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा निरा-देवधर पाण्याचा प्रश्न सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे, पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून प्रलंबित पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button