कीर्तन केसरी ह.भ.प. विकास महाराज देवडे, गणेशवाडी यांचे खुडूस येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

कै. पार्वती ठवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
खुडूस (बारामती झटका)
कैलासवासी पार्वती विठ्ठल ठवरे यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि. १९/०४/२०२४ रोजी खुडूस ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. यानिमित्त कीर्तन केसरी ह.भ.प. विकास महाराज देवडे, गणेशवाडी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. पार्वती ठवरे दि. १ एप्रिल २०२३ रोजी एकादशीच्या दिवशी वैकुंठवासी झाल्या. कै. विठ्ठल भाऊ ठवरे हे सुद्धा एकादशीच्याच दिवशी म्हणजे दि. ७ मार्च २००९ रोजी मयत झाले. या उभय पती-पत्नीने अतिशय हलाखीत दिवस काढले. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची त्यातच पाच पांडवांचा जन्म दिला. आपली पाचही मुलं लहान असताना घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे मातोश्री पार्वती या दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीला जात असत वडील. विठ्ठल भाऊ यांनी कधीच काबाडकष्ट केले नाही परंतु, त्यांचा ओढा जास्तीत जास्त सांप्रदायिक क्षेत्राकडे असायचा. सतत मुखी पांडुरंगाचे नामस्मरण असायचे. विठ्ठल भाऊ यांचे काही शिक्षण नसतानाही त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचे वाचन केलेले होते.
श्री. गणपत विठ्ठल ठवरे, श्री. मच्छिंद्र विठ्ठल ठवरे, श्री. उत्तम विठ्ठल ठवरे, श्री. शहाजी विठ्ठल ठवरे आणि श्री. अनंतराव विठ्ठल ठवरे या पाचही भावंडांनी अतिशय गरिबीत व हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. अशा कठीण परिस्थितीवर मात करून गणपतराव हे इरिगेन खात्यामध्ये डेप्युटी इंजिनीयर झाले, मच्छिंद्र आबा हे 1995 साली खुडूसगावचे सरपंच झाले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापतीही झाले. उत्तमराव यांनीही त्यांचे बीएससी चे शिक्षण पूर्ण करून उत्तम प्रकारे शेती करू लागले. त्याचबरोबर सर्वांचे लाडके ॲड. शहाजी काका हे 2008 साली खुडूस गावचे डेप्युटी सरपंच झाले. त्यानंतर २०१४ मध्ये गावचे विद्यमान सरपंच झाले. तर अनंतराव ठवरे यांनी शेती क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली. अतिशय चांगल्या प्रकारची शेती करून त्यांनी जन माणसांमध्ये नाव कमविले. आई-वडिलांच्या कृपा आशीर्वादामुळे या पाचही भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे.

ॲड. शहाजी काका यांनी 1997 साली वकिलीची पदवी घेऊन वकिली क्षेत्रामध्ये नाव कमावले. वकिली करत असताना खुडूस गावच्या विकासाचा ध्यास घेऊन सक्रिय राजकारणामध्ये येऊन समाजकारण करण्याच्या हेतूने कोठ्यावधी रुपयाचा निधी गावांमध्ये आणून खुडूस गावाचा कायापालट केला. व खऱ्या अर्थाने खुडूस गावाचा विकास घडविला. कोरोना काळातही त्यांनी आपल्या मातोश्रींच्या हस्ते खुडूस गावातील व परिसरातील गोरगरीब जनतेला लाखो रुपयाचे धान्य वाटप केले व अडचणीसाठी धावून गेले.
खऱ्या अर्थाने या पाचही भावंडांना गरिबीची जाण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गरिबीचे अनेक चटके सोसलेले आहेत. त्यामुळेच ते या खुडूस गावातील व परिसरातील गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सतत धावून जातात. अशा या ठवरे परिवारातील कै. पार्वती ठवरे यांच्या पुण्यस्मरणाचे आयोजन करण्यात आले. नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून यावे, अशी विनंती ठवरे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.