माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे माळशिरस तालुक्यात मताधिक्य कायम राहणार…

माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यात गत वेळेस मिळालेले मताधिक्य कायम राहणार अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.
माढा लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मतदारसंघात जाहीर सभेच्या वेळी जनतेला दिलेली आश्वासनांची पूर्णत्वाकडे वाटचाल असल्याने माढा लोकसभा मतदारसंघासह माळशिरस तालुक्यातील मतदारांच्या माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता झालेली असल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा-देवधर प्रकल्प अनेक दिवस रेंगाळत ठेवलेला होता. निरा-देवधरचा कागदावरील प्रकल्प प्रत्यक्षात आणून खासदार यांनी केंद्राकडे व राज्याकडे सततचा पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पिढ्यानपिढ्या प्रलंबित असणारी नीरा देवधरची योजना पूर्णत्वाकडे येत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. इंग्रज कालीन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे रखडलेली होती. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोणंद ते फलटण व फलटण ते बारामती रेल्वे मार्ग पूर्ण करून फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न निकाली काढलेला आहे. लवकरच निरा-देवधर व फलटण-पंढरपूर रेल्वेचे टेंडर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होत असल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यात गत वेळेस मिळालेले मताधिक्य कायम राहणार, अशी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात व जनसामान्य माणसात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.