अकलूज परिसरातील भूखंडाचा विषय ऐरणीवर येणार, सर्वसामान्य व गोरगरिबांना न्याय मिळणार….

ढोर समाजासह छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात…
अकलूज (बारामती झटका)
अकलूज पंचक्रोशीतील संग्रामनगर, यशवंतनगर, आनंदनगर, माळेवाडी, अकलूज अशा अनेक गावांमध्ये अनाधिकृत भूखंडाचा विषय ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय मिळणार आहे. अकलूज येथील ढोर समाजातील काही नेतेमंडळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भेटलेले आहेत. ढोर समाजातील काही लोकांना हाताशी धरून जमिनीचा गैरव्यवहार कशा प्रकारे झालेला आहे, याची सविस्तर कागदपत्रासह प्राथमिक चर्चा झालेली आहे. अकलूज पंचक्रोशीत सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वारसदार छत्रपती उदयनराजे महाराज यांची यशवंतनगर अकलूज येथे जमीनी आहेत. सदरच्या जमिनी एक रुपया किमतीवर घेतलेल्या शेकडो एकर जमीनीवर केलेले अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.
अकलूज परिसरात अनेक जमिनी अदलाबदल करीत असताना महसूल प्रशासनातील अधिकारी यांच्यावर दबाव टाकून शासकीय नियम धाब्यावर बसवून जमिनींचे व्यवहार वर्ग दोन व वर्ग एक अशा अदलाबदल करून जमिनीचे व्यवहार केलेले आहेत. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे बिगर शेती परवानगी नसताना तात्पुरते नर्सरी बिगर शेती करून कोट्यावधी रुपयाचे व्यवहार करून हजारांमध्ये कागदोपत्री दाखविण्यात आलेले आहेत. अकलूज नगर परिषद होत असताना अनेक लोकांवर अन्याय होऊन चौकामधील व मोक्याच्या जागी जाणीवपूर्वक आरक्षण बसविलेले आहे. अशाही लोकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट निवडणुकीच्या दरम्यान घेतलेली होती. निवडणुकीनंतर आपल्या सर्वांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दिलेले असल्याने अकलूज परिसरातील भूखंडाचा विषय ऐरणीवर येणार असून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.