निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचार संहिता का लावली जाते ?
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र हे राज्य भारताच्या राजकीय गणितांवर आणि आर्थिक विकासावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करीत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच कुतूहलाचा विषय बनला आहे. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने आज 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा निवडणूकांआधिची आचार संहिता लागू केली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात राज्यभर निवडणूका होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु त्याआधी जाहीर झालेल्या आचार संहितेबद्दल आपण अधिक माहिती मिळवूया.
आदर्श आचारसंहिता काय आहे?
निवडणूक आयोगाने लोकसभा, विधानसभा स्तरावरील निवडणूका स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने व्हाव्यात यासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष, नेते आणि सरकारने या नियमांचे पालन करणे अनिवार्य असते.
आचारसंहिता कधीपासून लागू होते?
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती लागू राहते.
आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत ?
आदर्श आचारसंहिता मुख्यत्वे राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा आणि मिरवणुका, मतदान दिवसाचे उपक्रम आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान कसे वागावे हे नमूद केले आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचे उल्लंघन करताना दोषी आढळल्यास निवडणूक आयोग त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतो.यामध्ये गुन्हेगाराला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यासह आवश्यक असल्यास आयोग फौजदारी खटलाही दाखल करू शकतो. दोषी आढळल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.
आचार संहिता लागू झाल्यानंतर
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी घोषणा, योजनांची घोषणा, प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी किंवा भूमिपूजन कार्यक्रम करता येणार नाहीत.
- निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन, सरकारी विमान किंवा सरकारी बंगला वापरता येणार नाही.
- कोणताही पक्ष, उमेदवार किंवा समर्थक यांना रॅली किंवा मिरवणूक काढण्यापूर्वी किंवा निवडणूक सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.
- कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मतदारांकडून मते मागू शकत नाही किंवा धर्म किंवा जातीच्या आधारावर मतभेद किंवा तणाव निर्माण करणारी कोणतीही कृती करू शकत नाही.
- पक्षाचे झेंडे, बॅनर इत्यादी कोणाच्याही जमिनीवर, घराच्या किंवा जागेवर परवानगीशिवाय लावता येणार नाहीत.
- मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने सक्तीने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला असतो. उमेदवारांकडून मतदारांना दारू किंवा पैसे वाटण्यासही सक्त मनाई असते.
- मतदानादरम्यान, मतदान केंद्राजवळील राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या छावण्यांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
- शिबिरे साधी असावीत आणि तेथे कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य असू नये. कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नयेत.
- सर्व पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेअंतर्गत ‘भ्रष्ट आचरण’ आणि गुन्हेगारीच्या श्रेणीत येणाऱ्या अशा सर्व कामांपासून परावृत्त केले पाहिजे – जसे की मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकावणे, बनावट मतांना परवानगी देणे, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर राहणे. मतदान केंद्राच्या हद्दीत प्रचार करणे, मतदान बंद झाल्यानंतरही प्रचार करणे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे.
- राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग निरीक्षकांची नियुक्ती करतो.
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येणार नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Thinker Pedia This was beautiful Admin. Thank you for your reflections.
Thinker Pedia There is definately a lot to find out about this subject. I like all the points you made
Your blog post is a testament to the power of storytelling. You had me hooked from the very first sentence!
I’ve been struggling with this issue for a while now, and your blog post provided some much-needed clarity. Thank you for shedding light on the subject.
v29lqo