ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचे मनस्वी स्वागत – संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील

केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत, मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या लढ्याला नवे बळ

मुंबई (बारामती झटका)

आज केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाद्वारे देशात जातनिहाय जनगणना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात वास्तव माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने लोकजन किंवा जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थिती केंद्र व राज्य सरकारपुढे स्पष्टपणे मांडता येईल. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्याला वैज्ञानिक आणि घटनात्मक आधार प्राप्त होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे.

ही जनगणना केवळ आकडेवारी नव्हे, तर समाजाच्या न्यायासाठीच्या लढ्याला दिशा देणारी ठरेल. त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा निर्णय मराठा समाजासह इतर वंचित घटकांच्या प्रतिनिधित्वाचा, समान संधीचा आणि सामाजिक न्यायाचा पाया भक्कम करणारा ठरेल, असे मत शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे मनापासून स्वागत करत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button