नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी सर्वोत्कृष्ट कामकाज करुन नावलौकिक टिकवला

श्रीपूर (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पुर्वक शुभेच्छा…
नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून गेली साडेतीन वर्षे अत्यंत उत्कृष्ट कामकाज करुन नावलौकिक टिकवला आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. सौ. लक्ष्मी चव्हाण यांनी नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महाळुंग श्रीपूर परिसरातील गोरगरीब जनतेची मनापासून सेवा केली आहे. त्या नगरपंचायतीमध्ये शासकीय पातळीवर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात अभ्यासपूर्ण भाषणं करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लहुजी साळवे वस्ताद यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. नगरपंचायतीकडे शासनाच्या ज्या योजना, प्रकल्प येतात, त्या जनतेपर्यंत, गरिबांच्या घरापर्यंत पोहचल्या पाहिजेत याकडे त्यांचे लक्ष असते.
नगरपंचायतीमध्ये आपल्या परिसरातील अडचणी, तक्रारी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यातून मार्ग काढतात. नगरपंचायतीमध्ये आतापर्यंत पुर्ण वेळ मुख्याधिकारी म्हणून कोणीही कायम टिकू शकले नाहीत, त्यांच्या बदल्या झाल्या. या सर्व मुख्याधिकारी यांना नगराध्यक्षा म्हणून त्यांनी पहिल्यापासून प्रामाणिक सहकार्य केले आहे. गेल्या साडे तीन वर्षांच्या कारकिर्दीत नगराध्यक्षा यांच्यावर कसलाही आरोप किंवा तक्रारी झाल्या नाहीत, ही त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.
नगरपंचायतीमध्ये स्थानिक गटबाजी, राजकीय रुसवे फुगवे, किरकोळ पातळीवर झाले असतील परंतु, त्या वादात त्या गटबाजीचे राजकारणात नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी डूंकूनही पाहिले नाही. त्या आपलं काम, सेवा प्रामाणिक करत राहिल्या आहेत. महिलांना अधिकार, न्याय मिळाला पाहिजे, त्यांची दखल घेतली जावी, याकडे त्यांचं नेहमी बारीक लक्ष असते. महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांचा सन्मान गौरव होतो. त्या मागासवर्गीय समाजातील आहेत म्हणून नाही, तर त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पुर्वक हार्दिक शुभेच्छा…