प्रत्येक गावाने वृक्षारोपण केल्यास पर्यावरण समतोल राहील – सरपंच नारायण तरंगे

तरंगफळ (बारामती झटका)
प्रत्येक गावाने जर वृक्ष लागवड व संवर्धन केले तर भारत देशाचा पर्यावरण समतोल व्यवस्थित राहील, असे प्रतिपादन तरंगफळ चे सरपंच नारायण तात्या तरंगे यांनी केले.
तरंगफळ येथे तरंगफळ ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन कृषी विभाग एकता शेतकरी गट, सिद्धनाथ शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शेतकरी मार्गदर्शन शिबिर, प्रात्यक्षिक आणि वृक्षारोपण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक सतीश कोळेकर तरंगफळचे कृषी सहाय्यक नितीन शिंदे, कृषी अधिकारी मोहिते, सरपंच नारायण तात्या तरंगे, एकता शेतकरी गटाचे अध्यक्ष सुजित तरंगे, सिद्धनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष सर्जेराव तरंगे, दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर, माजी सरपंच रावसाहेब तरंगे, ग्रामपंचायत सदस्य भगवान तरंगे, सागर बोडरे, विलास तरंगे यांचेसह शेतकरी, ग्रामस्थ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. कोळेकर यांनी बीज प्रक्रिया, फळबाग लागवड प्रात्यक्षिक, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले. श्री. शिंदे यांनी शासनाच्या विविध योजना डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन योजना याविषयी सविस्तर माहिती देऊन तरंगफळ येथे फळबाग आणि केळी लागवड शासनाच्या योजनेतून घेण्यात तरंगफळ गाव पुढे असून राहिलेल्या शेतकऱ्यांनीही कृषी विभाग ग्रामपंचायतशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.