श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वशिल्याचे दर्शनबंदीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत पण, मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन कायम बंद करण्यात यावी.

पंढरपूर (बारामती झटका)
वरील विषयासंदर्भात आपणाकडे निवेदनाद्वारे मागणी करतो की, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेचा पाठिंबा आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने निर्णय योग्य घेतल्याबद्दल आम्ही समितीबरोबर आहे. पण मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन कायमचं बंद केले पाहिजे. फक्त हा निर्णय नावालाच फक्त बंद कारण की, पंढरपूर शहरातल्या काही सामाजिक संघटना असतील काय, राजकीय पक्ष असतील, यांची काही नेते मंडळी मित्रमंडळी ही येत असतात. त्यांना व्हीआयपी पद्धतीने दर्शन आपण देतो. हा निर्णय राजकीय वरिष्ठ अधिकारी सरकारमधले मंत्री यांना पण नियम लागू झाला पाहिजे. व्हीआयपी दर्शन कायमचं बंद झाले पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनच मागणी आहे. येणाऱ्या आषाढीवारीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे, तेव्हा मा. मुख्यमंत्री साहेब पंढरपूरमध्ये आले की, महाराष्ट्रामधले अनेक भाजपा मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, पदाधिकारी हे पण येतात. तेव्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने व्हीआयपी पास दिले जातात. ते व्हीआयपी दर्शनाची पास कायमचे बंद केले पाहिजे. तेव्हाच आपण घेतलेल्या निर्णयाचे भाविकभक्तांमधून मनापासून स्वागत होईल, अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने आम्ही निवेदनामार्फत आपणाकडे करत आहोत. कारण, येणाऱ्या २०२५ आषाढी वारीतल्या भाविक भक्तांना खूप त्रास सहन करावा लागतो. आपण व्हीआयपी पास बंद केले तर हा त्रास भाविकांना होणार नाही.
तसेच महाराष्ट्र सरकारने जी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पोलीस सुरक्षा दिली आहे. आणि मंदिर समिती प्रायव्हेट सुरक्षा रक्षक ठेवते, प्रायव्हेट सुरक्षारक्षक न ठेवता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्रामध्ये होमगार्ड आहेत, यांनाच आपण होमगार्ड सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात यावे.
होमगार्ड सुरक्षा रक्षकामुळे भाविकभक्तांना योग्य सुरक्षा मिळेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घातलेली आहे.ती बंदी योग्यच आहे. जो भावीभक्तांना नियम लागू केला आहे, तोच नियम मंदिरे समितीतील सर्व कर्मचाऱ्यांना लावण्यात यावा. कारण मंदिरामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाईल नेण्यास कायम बंदी करण्यात यावी. या सर्व गोष्टी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अंमलात आणल्या तर लवकरच मंदिरातील भ्रष्टाचार बंद होईल. मंदिर समितीच्या निर्णयामुळे सामान्य भाविकांना सुलभपणे लवकर दर्शन मिळण्याची सोय आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने वशिल्याचे दर्शन बंदीचा निर्णय केल्याबद्दल समितीचे मनापासून आभारी आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आलेल्या भाविकांना झटपट दर्शन व्हावे यासाठी कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनाचा लाभ देऊ नये, असा आदेश रविवारी काढला होता. मात्र सोमवारीच व्हीआयपी दर्शनाला सोडताना दिसून आले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा मंदिर समितीमध्ये वचक राहिलेली दिसत नाही. मग याअधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची कठोरपणे कारवाई करण्यात यावी. जे कर्मचारी आदेश पाळत नाहीत. त्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे. राज्य सरकारने अशा अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी सांगितले आहे. मंदिर समितीने निवेदनाची दखल नाही घेतली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आषाढी एकादशी मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असा इशारा शिवस्वराज युवा संघटन संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील यांनी दिला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.