ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

” बोले तैसा चाले त्याची, वंदावी पावले ” या म्हणीचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कृतिशील कार्यातून प्रत्यय येत आहे..

आश्वासने देणारे अनेक असतात मात्र आश्वासनाची पूर्तता करणारे माणदेशी नेता जयाभाऊ पिडीतांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत…

सातारा (बारामती झटका)

महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये कृतिका नक्षत्रामध्ये मे महिन्यात पावसाने पावसाळ्यासारखी हजेरी लावलेली होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जोरदार वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना व शेतकरी बांधव यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसून धीर देण्याचे काम माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी मतदार संघामध्ये झंजावाती दौरा करून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केलेली होती. त्यामध्ये नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आश्वासन दिलेले होते. परिस्थिती पाहून आश्वासने देणारे अनेक असतात मात्र आश्वासनाची पूर्तता करणारे माणदेशी नेता जयाभाऊ पिडीतांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचा प्रत्यय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कृतीशील कार्यातून येत आहे. नुकसानग्रस्त पीडितांचा जयाभाऊ यांच्याहस्ते मदतीचे धनादेश आदेश सुपूर्द केल्यानंतर पीडितांच्या चेहऱ्यावरील भाव पाहिल्यानंतर आपला जयाभाऊ याची जाणीव पीडितांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

माण तालुक्यात दि.२०/०५/२०२५ रोजी जोरदार वारे व पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, शेतीचे नुकसान तसेच पशुधनाची हानी झाली होती. पळशी, ता. माण येथील कै. नवनाथ पाटोळे हे आपल्या घरी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने नदीला आलेल्या पुरात वाहून गेले होते. दिनांक ३० मे २०२५ रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त झालेल्या घरांची, पशुधनाची व इतर मालमत्तेची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच पळशी येथे नवनाथ पाटोळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाचे मदतीचे धोरण असून त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. १३/०६/२०२५ रोजी बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी पीडितांचे धनादेश व आदेश देण्यात आले.
🔷 श्रीमती माधुरी नवनाथ पाटोळे यांना ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश
🔹 कुरणेवाडी येथील सुभाष दिनकर आटपाडकर यांची १ म्हैस व १ वासरू ५७,५०० रुपयांच्या मदतीचे धनादेश
🔷पळसावडे येथील भाऊसाहेब गुलाब धुलगुडे यांची १ म्हैस ३७,५०० रुपयांच्या मदतीचा धनादेश
🔷 थदाळे येथील राणी दिगंबर शिंगाडे यांची १ गाय ३७,५०० रुपयांच्या मदतीचा धनादेश
🔷 गंगोती येथील गोरख अण्णा विरकर यांची १ गाय ३७,५०० रुपयांच्या मदतीचा धनादेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), माजी सभापती अतुलदादा जाधव, तहसीलदार विकास अहिर यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button