अरण ते पंढरपूर हा रस्ता पालखी मार्गात समाविष्ट करा, माऊली हळणवर यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेकडे मागणी.

अरण (बारामती झटका)
अरण येथे संत सावता माळी चंदन उटी कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आले असता भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर यांनी निवेदन दिले .
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, संत सावता माळी यांच्या भक्तीसाठी स्वतः विठ्ठलाने त्यांच्या अरण येथील शेतामध्ये जाऊन दर्शन दिले होते. पंढरपूरकडे अनेक संतांच्या पालख्या येतात. राज्य सरकारने हे सगळे पालखी मार्गांचे चौपदरीकरण केले असून संत सावता माळी यांच्या भेटीसाठी पांडुरंगाची पालखी अरण येथे जात असते. परंतु, अरणकडे जाणारा रस्ता एकेरी असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. प्रत्येक वारीच्या वेळेस भाविक प्रचंड संख्येने अरण येथे दर्शनासाठी येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अरण या तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा देऊन 100 कोटी निधी जाहीर केला असून एक मोठे विकासाचे काम येथे होणार आहे. अरणला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता हा रस्ता अपुरा पडणार आहे. म्हणून अरण ते पंढरपूर या रस्त्याचे पालखी मार्गात रूपांतर करून हा रस्ता चौपदरी करावा, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
यावेळी माऊलीभाऊ हळणवर, भाजपा करकंब मंडलाध्यक्ष हर्षद कदम, संजय लवटे सर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.