ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

भागवत सांप्रदायात ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’, ग्रामविकास खात्यात आर. आर. आबांनी रचलेल्या पायावर जयाभाऊ यांनी कळस उभा केला…

पंढरीचा विठुराया साधू संतांच्या पाठीशी ठाम तसेच राजकीय विठुराया देवाभाऊ राजकीय नेत्यांच्या पाठीशी ठाम..

पंढरपूर (बारामती झटका)

श्रीक्षेत्र पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी दक्षिण काशी संबोधले जाते. पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठुराया साधू संतांच्या पाठीशी ठाम राहिलेले आहेत. भागवत सांप्रदायात ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे संबोधले जाते. याचाच प्रत्यय राजकीय विठुराया देवाभाऊ राजकीय नेत्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिले असल्याने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास खात्याचा आर. आर. आबांनी रचलेल्या पायावर जयाभाऊ यांनी कळस उभा केलेला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी ग्रामविकास खात्याचा कळस उंचीवर चढविलेला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण विकास खात्याचा कारभार अण्णासाहेब डांगे, विजयसिंह मोहिते पाटील, जयंतराव पाटील, पंकजाताई मुंडे, आर. आर. पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी खात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावगाड्यातील अनेक कलह भावभावकीतील व सगे-सोयरे यांच्यामधील कलह कमी ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करून राज्यामध्ये ग्रामविकास खात्याची उंची वाढविलेली होती. आर. आर. आबांनी ग्रामविकास खात्याची उंची वाढवून रचलेल्या पायावर जयाभाऊ यांनी कळस उभा केलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळातील विविध खात्यांच्या मंत्र्यांना शंभर दिवसाचा प्रोग्रॅम ठरवून दिलेला होता. त्यामध्ये ग्रामविकास खात्याचा यशस्वी कारभार करून जयाभाऊ यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या खात्यामध्ये विकास कार्यातून चौथा क्रमांक पटकावलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळावे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी २० लाख लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करून १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता खात्यावर वर्ग केला. आजपर्यंतच्या इतिहासात कधीच एवढ्या घरकुलाचे वाटप शासनाकडून केलेले नव्हते.

आषाढी वारीची परंपरा गेल्या सातशे वर्षापासून सुरू आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या नगरीमध्ये लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून नव्हे तर परदेशातून भाविक पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त येत असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पायीवारी मजल दर मजल करत हरिनामाच्या जयघोषामध्ये टाळ मृदुंगाच्या निनादात ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता पंढरीच्या नगरीकडे येत असतात. आषाढी वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची सुख सुविधा व सेवा देण्याचे काम शासनाच्या वतीने करीत असतात. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्या माध्यमातून प्रशासन वारीमध्ये भक्तांची सेवा करीत असतात.

यंदाची आषाढी वारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवून पंढरपूर स्वच्छ व चकाचक केलेले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. मात्र, माणदेशी संघर्ष योद्धा जयाभाऊ यांनी पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारीने उंची वाढवलेली आहे. मिळालेल्या संधीचे जयाभाऊ यांनी सोने केलेले आहे. पंढरपूर पंचक्रोशीत जयाभाऊ यांच्या महास्वच्छता अभियानाचे कौतुक केले जात आहे. पंढरपूर पंचक्रोशीमध्ये एकच नाद घुमत आहे, श्री विठ्ठल रुक्मिणीचे दास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास, सोलापूर जिल्ह्याचे बॉस, महास्वच्छता अभियान राबविले झकास, असे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ. ना. जयकुमार गोरे यांच्याविषयी भाविक भक्तांमध्ये प्रेम व आत्मियता निर्माण झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button