दुष्काळी जनतेचा तारणहार पालकमंत्री झाला, निसर्गाला सुद्धा आनंद झाला वरूणराजा बरसला….

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार घेताना श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धरामय्या, श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले त्यांचाच आशीर्वाद मिळाला..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर पालकमंत्री पदाचा पदभार घेण्याकरता शिखर शिंगणापूर येथे धर्मपत्नी सौ. सोनिया गोरे यांच्या समवेत सपत्नीक शंभू महादेवाला अभिषेक करून पहिल्यांदा माळशिरस तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जंगी स्वागत केलेले होते. त्यावेळी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दक्षिण काशी संबोधले जाणारे जगाचा मालक पंढरीचा परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामय्या व भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला होता.
माणदेशी सुपुत्र जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. दुष्काळी भागामध्ये पाण्याची गंगा आणून दुष्काळी जनतेचे व शेतकऱ्यांचे तारणहार बनलेले आहेत. दुष्काळी जनतेचा तारणहार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला, निसर्गाला सुद्धा आनंद झाला, वरूणराजा वेळेच्या अगोदर बरसला असल्याने सोलापूर जिल्ह्यात शेतकरी समाधानी झालेले आहेत.
निसर्गामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू प्रामुख्याने मानले जातात. 25 मे रोजी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होते. तिथूनच खरा पावसाळा सुरू होतो. ढगांच्या गडगडाटाला सुरुवात होते. 07 जूनला मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. परंतु यंदाच्या वर्षी कृतिका नक्षत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि हस्त नक्षत्र प्रमाणे पावसाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 65 मिलिमीटर ते 113 मिलिमीटर पर्यंत पाऊस पावसाळ्या अगोदरच पडलेला आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन बैठकीनंतर टंचाई आढावा बैठक घेतली होती. सदरच्या टंचाई बैठकीमध्ये प्रशासनाला सूचना केलेल्या होत्या. पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यानंतर 48 तासात टँकर देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. परंतु माळशिरस तालुक्यातील जळभावी गावाला 24 तासातच पाण्याचा टँकर मिळालेला होता. गावचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी आनंदाने टँकरचे पूजन करून पाणी वाटप केलेले होते. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी जनतेचा तारणहार पालकमंत्री झालेला निसर्गालासुद्धा आनंद झालेला आहे. वरूणराजा पावसाळ्यातील वेळेच्या अगोदर बरसला असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पावसाचे दिवस खरे गौराई गणपती, नवचंड, परतीचा पाऊस अजून किती वरूणराजा बरसणार यावर शेतकऱ्यांचे अवलंबून असते. सध्या वापसा आल्यानंतर अनेक शेतकरी शेतामध्ये पेरणी सुरू करतील. यंदाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज व अनेक पालख्यांचे जंगी स्वागत पालकमंत्री या नात्याने पहिल्यांदाच स्वागत करणार आहेत. वरूणराजाच्या आगमनामुळे समाधानी शेतकऱ्यांच्या वतीने ठीकठिकाणी होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.