मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या भव्य स्मारकाची घोषणा

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण दुर्घटनेनंतर राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी भाषणासाठी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण काढली. इतकेच नाही थर अजितदादा पवार यांच्या स्मारकाची घोषणा देखील केली.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच अजितदादा पवार यांची आठवण काढळी. मुख्यमंत्री म्हणाले की, “हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”
अर्थमंत्री म्हणून आजवर असंख्य वेळा अजितदादा पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, याची आठवण देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढली. तसेच अजितदादा पवारांच्या आर्थिक शिस्तीमुळेच राज्याची स्थिती स्थिर राहिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
“त्यांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



