ताज्या बातम्याराजकारण

ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांना माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या निवेदनाने गाव गाड्यातील कार्यकर्ता जागा झाला…

ग्रामविकास खात्याची जबाबदारी गाव गाड्यातील आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे आल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या…

माळशिरस (बारामती झटका)

गाव गावगाड्यातील मिनी मंत्रालय म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी गावगाड्यातील आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे आलेली असल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या निवेदनाने गाव गाड्यातील कार्यकर्ता जागा झालेला आहे.

शगावातील विविध मंजूर विकास कामांसाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत किंवा NOC ची अट काढून टाकणे बाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमारजी गोरे यांची भेट घेतली.

गावागावात विविध लेखाशीर्ष अंतर्गत कामे मंजूर होत असतात. परंतु, या मंजूर कामांसाठी ग्रामपंचायतीचा ठराव किंवा ना हरकत दाखला आवश्यक असतो. अनेक ग्रामपंचायती विरोधकांच्या ताब्यात असल्यामुळे ते ग्रामपंचायतीचा ठराव किंवा ना हरकत पत्र देत नाहीत. या कारणामुळे गावातील विकास कामे करण्यास अडथळा निर्माण होत आहे. काम न झाल्यामुळे एकतर तो निधी तसाच पडून राहतो किंवा लॅप्स होतो.

वरील परिस्थिती लक्षात घेता गावातील मंजूर विकास कामांसाठी ग्रामपंचायतीच्या ठरावाची किंवा ना हरकत दाखल्याची अट काढून टाकण्याबाबतची विनंती निवेदनाद्वारे केली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button