कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा मतदार संघात अतिवृष्टी पाहणी झंजावाती दौरा

दहिवडी (बारामती झटका)

संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यासह माण_खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेती, पिके, घरांची पडझड, पशुधन तसेच रस्त्यांचे नुकसान व काही प्रमाणात इतर नुकसान झाले आहे. आज शुक्रवार दि. ३० मे २०२५ रोजी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री. जयकुमार गोरे यांनी कुळकजाई, मलवडी, भांडवली, आंधळी, टाकेवाडी म्हसवड, पळशीसह इतर ठिकाणी अतिवृष्टी पाहणी दौरा करुन शेतकरी व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. या अतिवृष्टीमुळे गावोगावी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी दळणवळणासाठी महत्वाचे असलेले पूल वाहून गेले आहेत. त्याच्या दुरुस्तीची सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पळशी, ता. माण, येथील नवनाथ पाटोळे यांचा माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून शासनाकडून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

म्हसवड येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून खचलेला रस्त्याचे झालेले नुकसान आणि विविध भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीदरम्यान त्यांना झालेल्या नुकसानीची शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देतानाच सोबत असलेले वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार प्रतिनिधी, तलाठी, मंडळ अधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणेला शेतकरी बांधवांच्या नुकसानीची योग्य व सरसकट नोंद घेण्याचा सूचना केल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, प्रांत उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिर, मुख्याधिकारी सचिन माने, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, बांधकामसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे, संजय (काका) गांधी, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), मा. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, ज्येष्ठनेते हरिभाऊ जगदाळे, विलासराव देशमुख, विधानसभा प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले, रमेश गावडे पाटील, दादासाहेब काळे, किसन सस्ते, माण तालुका (दहिवडी मंडल) भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे, म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, एडवोकेट दत्तात्रय हांगे, परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम, सुनील पोरे साहेब, म्हसवडचे मा. नगराध्यक्ष विजय धट, युवानेते लुनेश विरकर, अल्पसंख्यांक आघाडी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अकिल काझी, निलेश दडस, विक्रम कदम यांच्यासह पत्रकार बांधव व अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यातील गावचे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

परिस्थिती भयंकर असली तरी शेतकरी व नागरिकांनी खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन यावेळी केले. अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटामुळे झालेल्या शेती, पिक व अन्य नुकसानीची मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी तत्काळ पाठपुरावा केला असून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button