जकरायाचे यशाचे आणखी एक शिखर सर ..!

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
या उन्हात तळणाऱ्या आणि मातीत मळणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचे मोल अनमोल असते. हे जाणून बळीराजाचा हक्काचा साखर कारखाना म्हणून नावारूपाला आलेल्या मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगरने आता सीबीजी प्रकल्पात आणखी एक यशाचे शिखर सर केले आहे.
एका दिवसात “रेकॉर्ड ब्रेक” सतरा हजार पाचशे किलो गॅस निर्मिती करून प्रतिदिन देशातील सर्वाधिक गॅस निर्मिती करणारा प्रकल्प म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.
तंत्रज्ञानातील नाविन्याचा ध्यास घेत जकराया शुगरने केवळ उसाचे गाळप करून साखर उत्पादित करण्यापेक्षा विविध उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य दिले आहे. जकराया शुगरचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. बी.जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी संचालक मा. सचिनदादा जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल (मालक) जाधव यांनी या व्यवसायातील कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि कोणत्याही तज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाशिवाय सर्व कामगारांनी केवळ समर्पित भावनेने काम केल्याने विविध उपपदार्थ निर्मितीत यशाचे नवनवे मापदंड तयार केले आहेत. जकराया शुगरचा सीबीजी प्रकल्प हे त्या यशाच्या मापदंडाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

१५ फेब्रुवारी २०२४ ला या प्रकल्पाची सुरुवात झाली. आता देशातील साखर कारखानदारांसमोर पथदर्शी ठरत असलेल्या या प्रकल्पातील सुरूवातीला आलेल्या तांत्रिक अडचणीने मा. सचिनदादा आणि मा. राहुल मालकांच्या संयमाची परीक्षा घेतली. मात्र “सब्र का फल मीठा होता है” हे ओळखून या दोघा बंधूंनी पूर्णवेळ या प्रकल्पावर “फोकस” ठेवला. अखेर सर्व कामगारांच्या प्रयत्नाला यशाची भरजरी किनार लाभली. वीस हजार किलो प्रतिदिन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून सतरा हजार पाचशे किलो गॅस एका दिवसात उत्पादन करण्यात आले. शुद्धता आणि उच्च गुणवत्ता या जोरावर लवकरच वीस हजार किलोचाही टप्पा ओलांडू, ही आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या पाठबळाच्या जोरावर खात्री आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



