ताज्या बातम्याराजकारण

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या पायीवारी पालखीचे स्वागत करून पालकमंत्री आमदारांसह अधिवेशनाला विमान वारी…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देश विदेशातून आषाढी वारीसाठी भाविक भक्त पंढरपूर येथे येत असतात. आषाढी वारीला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने हरिनामाच्या जयघोष यामध्ये मजल दर मजल करीत येत असतात.

सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर माळशिरस तालुक्याच्या धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे व सौ. सोनिया गोरे, आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, प्रांताधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा प्रशासनाकडून माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत करून माऊलींचे जिल्ह्यांमध्ये उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये आगमन झाले.

संतश्रेष्ठ माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होवून सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ बारामती येथून विमानाने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत आ. सचिनदादा कल्याण शेट्टी, आ. देवेंद्रदादा कोठे, मा.आ. रामभाऊ सातपुते यांनी विमानातून एकत्र प्रवास केला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी वारी पालखीचे स्वागत करून पालकमंत्री आमदारांसह अधिवेशनाला विमान वारी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याकरता मुंबईकडे रवाना झाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button