मांडवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडीत मालन खोमणे विजयी.
तानाजी पालवें च्या सदस्यांच्या सहकार्याने विठ्ठल पालवे गटानं दाखवलं दिग्गजांना आसमान !
मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतमधील उपसरपंच पदाची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये गावातील जयवंत पालवे गटाकडून ग्रामपंचायत सदस्य सुरज साळुंखे हे तानाजी पालवे यांच्या गटातून निवडून आले होते. परंतु सहा महिन्यापूर्वी अर्जुन दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी पालवे यांच्या गटातून निघून जयवंत पालवे गटात सामील झाले. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी तानाजी पालवे यांच्यावरती उर्वरित राहिलेल्या सदस्यांनी तानाजी पालवे यांनीच साळुंखे दुधाळ यांना मोकळीक देऊन पदासाठी जाण्यासाठी सल्ला दिला, असा तानाजी पालवे यांच्यावर आरोप झाला होता. त्यामुळे या निवडणुकी दरम्यान तानाजी पालवे सहित उर्वरित सदस्यांनी तानाजी पालवे यांच्यावर दबाव टाकत फुटीर झालेल्या सदस्यांच्या विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले. यावेळी साळुंखे यांच्या विरोधात विठ्ठल पालवे गटाच्या मालन खोमणे उभा होत्या. त्यांना सहकार्य करण्याचा निर्णय झाला ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु विठ्ठल पालवे गटाने अचूक नियोजन करत ऐनवेळी जयवंत पालवे यांच्या विरोधात बाकी सदस्यांना एकत्रित करत सर्वांना विश्वासात घेऊन अनपेक्षितपणे मालन खोमणे यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने पाठबळ उभा केले. व मालन खोमणे अटीतटीच्या निवडीमध्ये मांडवे ग्रामपंचायत उपसरपंच पदी विराजमान झाल्या. त्यामुळे विठ्ठल पालवे गटाने या निवडीमध्ये दिग्गजांना असमान दाखवले, अशी चर्चा आहे. यापूर्वी मांडवे गावामध्ये तानाजी पालवे व जयवंत पालवे असे दोन गट अस्तित्वात होते. परंतु आता युवकांचा नवा गट उदयास येत असल्यामुळे गावाला तिसरा पर्याय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडीमध्ये विठ्ठल पालवे गटाने माजी सरपंच तानाजी पालवे गटाचे सहकार्य घेतल्यामुळे विठ्ठल पालवे यांना या निवडीमध्ये विजय सोपा करता आला.
ही निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली. निवडीनंतर मालन खोमणे समर्थक व विठ्ठल पालवे मित्र परिवारांनी फटाक्याची अतिशबाजी करत गुलालाची उधळण केली. यानंतर गावामध्ये एकच चर्चा रंगली की हर बच्चा छोटा नही होता, और तब्येत से बडा आदमी मोटा नही होता…
ही निवड जरी गावासाठी धक्कादायक असली तरी येणाऱ्या काळामध्ये अनैसर्गिक होत असणाऱ्या गटबंधनाला आळा घालणारी आहे, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. गत सरपंच, उपसरपंच निवडी दरम्यान तानाजी पालवे यांच्यावर होत असणाऱ्या आरोपांना खंडन करताना तानाजी पालवे यांची गत निवडणुकीत झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये तानाजी पालवे यांना विश्वासात न घेतल्याचा फटका सुरज साळुंखे व अर्जुन दुधाळ यांना बसला असावा, अशी चर्चा आहे. या निवडी दरम्यान तानाजी पालवे यांची भूमिका महत्त्वाची राहिली असली तरीदेखील त्यांनी पार्टी प्रमुख हा पार्टी प्रमुखच असतो. व त्याचं असणारं अस्तित्व त्यांच्या निष्ठावंत उर्वरित सदस्यांनी या निवडणुकीदरम्यान दाखवून दिले आहे. त्यांचा निर्णय कदाचित बऱ्याच जणांना अडचणीत आणणारा असू शकतो. यापुढच्या निवडीवर या निवडीचा नक्कीच परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
ही निवड मालन खोमणे यांच्या विजयासाठी होतीच. परंतु, पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक होती. गावाचं राजकारण हे विकासासाठी असावं, ना की खुर्चीत बसून स्वतःची शान वाढवण्यासाठी. या निवडणुकीच्या माध्यमातून पत्रिकेमध्ये नाव सरपंच/उपसरपंच लिहिण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरवले. त्यामुळे यापुढील काळामध्ये राजकारणामध्ये पोरांचं अस्तित्व कोणीही कमी करण्याच्या भानगडीत पडू नये. जशास तशी उत्तर दिली जातील. राजकारणातील डावपेच तुमच्या काळामध्ये लँडलाईन फोन सारखे होते परंतु, युवा पिढी स्मार्टफोन झाली आहे, याची दिग्गजांनी नोंद घ्यावी. – विठ्ठल पालवे, ग्रामपंचायत सदस्य मांडवे,
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.