माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot_2024_0623_162757-719x470.png)
बारामती (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक बारामती येथे दि. 22 व 23 रोजी पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक शेतकऱ्यांचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot_2024_0619_223103.png)
माळशिरस तालुक्यात लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते, पदाधिकारी वेगवेगळे पक्षाबरोबर दिसून आले असल्याने माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तालुका कार्यकारणी तातडीने बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी माळशिरस तालुका दौरा करून लवकरात लवकर नवीन निवडी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.