माळशिरस तालुक्यातील वर्षानुवर्षे खुतून बसणाऱ्या ग्रामसेवकांची तडका फडकी बदली….

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा ना. जयकुमार गोरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले जात आहे…
माळशिरस तालुक्यातील ट्वेंटी-ट्वेंटी खेळणारे ग्रामसेवक तालुक्याच्या पॅव्हिलिनच्या बाहेर अनेक वर्षाची खदखद संपली…
माळशिरस (बारामती झटका)
शासनाचे नियम धाब्यावर बसवून वर्षानुवर्ष पदाधिकाऱ्यांच्या खुर्ची सोबत संगणमताने 20 ते 25 वर्ष कामकाज करणाऱ्या ग्रामसेवकांच्या माळशिरस तालुक्याच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.
पारंपारिक सत्ताधाऱ्यांशी सूत जुळवून किमान २० ते २५ वर्ष एकाच तालुक्यामध्ये तसेच पाच ते दहा वर्ष एकाच ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांना धरून नियमबाह्य नेमणूका करून कामकाज करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे खुतून बसणाऱ्या १२ ग्रामसेवकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १२ ग्रामसेवकांच्या बदल्या माळशिरस तालुक्या बाहेर केलेल्या त्वरित सदर आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत गट विकास अधिकारी यांना कळविलेलेआहे. माळशिरस तालुक्यातील ट्वेंटी-ट्वेंटी वर्ष एकाच तालुक्यात खेळणारे ग्रामसेवक तालुक्याच्या पॅव्हिनिलच्या बाहेर गेलेले असल्याने अनेक वर्षाची अंतर्गत खदखद संपलेली आहे.
आमची बदली कोणी करू शकत नाही आणि आमचे गाव आमच्या परस्पर किंवा आमच्या नेत्यांच्या परस्पर कोणीही काढून घेऊ शकत नाही, अशा अविर्भावामध्ये असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील बारा ग्रामसेवकांच्या बदल्या माळशिरस तालुक्याच्या बाहेर म्हणजेच सांगोला तालुक्यात एच. एस. पवार एकशिव, डी. के. गोरे दहिगाव, पी. एस. दुधाळ डोंबाळवाडी (कु), पांडुरंग एकतपुरे मोटेवाडी (मा.), एस. एन. होळ रेडे, पी. बी. काळे जळभावी, पंढरपूर तालुक्यात सतीश उरवणे मळोली, अशोक लोंढे मोरोची, एस. बी. मुंगूसकर संग्रामनगर, स्वाती क्षीरसागर वाफेगाव, सुजाता भोसले येळीव, माढा येथे एन. आर. शेख पानिव अशा ठिकाणी प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत. ग्रामसेवकांच्या पुढे गावांची नावे आहेत त्या ठिकाणी हे सर्वजण सध्या कार्यरत होते. त्यांच्याकडे इतरही काही गावांचा सोयीनुसार व आशीर्वादाने अतिरिक्त पदभार होता.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे साहेब यांच्या हे लक्षात आल्याने आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या काखेमध्ये बसून प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या बांडगुळांची बदली करण्याचे आदेश मंत्रालय स्तरावरून करण्यात आले. सदर आदेशाची अंमलबजावणी म्हणून त्वरित आदेशाची अंमलबजावणी करून तडकाफडकी ग्रामसेवकांना तालुक्याबाहेर काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेले आहेत. या धाडसी निर्णयाच्या आदेशाचे स्वागत संपुर्ण माळशिरस तालुक्यात केले जात आहे. यातील जवळजवळ सर्वच ग्रामसेवक हे वीस ते पंचवीस वर्षापासून माळशिरस तालुक्यामध्येच प्रशासकीय सेवा बजावत होते. सदर सेवा बजावत असताना पदाधिकाऱ्यांच्या कानामध्ये गुप्तगु करून बाहेरील तालुक्यातील ग्रामसेवकांना माळशिरस तालुक्यामध्ये पदभार घेऊ दिला जात नव्हता. तसेच माळशिरस तालुक्याच्या बाहेर बदली करते वेळेस माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिफारशी जोडून बदल्या रद्द करण्याची परंपरा कायम ठेवण्यात येत होती. परंतु माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांनी अशा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित तालुक्याबाहेर काढण्याचे काम एका आदेशाने केलेले आहे. त्यामुळे संपूर्ण माळशिरस तालुका स्वच्छ झालेला आहे. त्याचप्रमाणे थोड्याच दिवसात अजूनही जवळजवळ पंधरा ग्रामसेवकांवरती पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचे कारणावरून तालुक्याबाहेर जाण्याची वेळ लवकरच येणार आहे, असे जिल्हा प्रशासनातील सुत्रांकडून बारामती झटका न्यूज यांना कळालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.