ताज्या बातम्या

मोरोची येथील समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…

मोरोची गावचे माजी सरपंच शिवाजीराव सुळ पाटील व माजी उपसरपंच तानाजीराव सुळ पाटील यांना मातृषोक..

मोरोची (बारामती झटका)

मोरोची ता. माळशिरस, येथील समाबाई आप्पासाहेब सुळ पाटील यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वार्धक्याने गुरुवार दि. 22 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. मोरोची गावचे माजी सरपंच शिवाजीराव सुळ पाटील व माजी उपसरपंच तानाजीराव सुळ पाटील यांच्या मातोश्री होत्या. तर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर आजच शिंगणापूर पाटी नजीक मोरोची हद्दीतील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार संध्याकाळी 08 वाजता करण्यात येणार आहे.

समाबाई व आप्पासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा कष्टातून स्वर्ग बनविलेला होता. काही वर्षांपूर्वी आप्पासाहेब यांचे दुःखद निधन झालेले होते. त्यानंतर शिवाजीराव व तानाजीराव यांना मातृत्व आणि पितृत्व दोन्हीही जबाबदाऱ्या समाबाई यांनी सांभाळलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मुलांचा व नातवांचा संसार करण्यामध्ये हातभार लावलेला होता.

समाबाई यांच्या दुःखद निधनाने सुळ पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुळ पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button