ताज्या बातम्यासामाजिक

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी NDRF जवान व महसूल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले..

माळशिरस तालुक्यातील कुरबावी येथील पुरात अडकलेल्या तीन पुरुष, दोन महिला व एका बालकाची केली सुटका.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे जबाबदार व कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी NDRF जवान व महसूल प्रशासनाच्या प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याचे कौतुक केलेले आहे.

नीरा-भीमा खोऱ्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. सद्यस्थितीत निरा नदी पात्रातून 25,25,300 चा विसर्ग वाढलेला आहे. वाढलेला विसर्ग पाहता भीमा नदी पात्रातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. नीरा नदीला पूर आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना करून एन डी आर एफ जवान माळशिरस तालुक्यामध्ये रवाना होण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाचे पालन प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम व उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस प्रशासनातील नातेपुते, माळशिरस, अकलूज व वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील नदी, ओढे, नाले यावरील पुलांवरून पाणी वाहत असल्यास सदरची वाहतूक ठप्प करून अन्य मार्गाने सुरू केलेली होती.

कुरबावी, ता. माळशिरस, येथील निरा नदीच्या पुरात अडकलेले राजेंद्र भीमराव ढवळे वय 36, दीपक आजिनाथ ढवळे वय 34, दत्तात्रय रामचंद्र ढवळे वय 70, वर्षा विवेक ढवळे वय 30, वर्षा राजेंद्र ढवळे वय 34, संचित विवेक ढवळे वय 14 तीन पुरुष, दोन महिला व एक बालकाचा समावेश होता. संध्याकाळी पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते. ढवळे कुटुंबीय पाण्यात अडकलेले होते. एनडीआरएफ जवानांच्या मदतीने पुरात अडकलेल्या ढवळे कुटुंबांना अथक परिश्रमाने रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढलेले आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसीलदार अमोल कदम रात्रभर नदीपात्राच्या ठिकाणी उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार सुरेश शेजुळ यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे यांना कुरबावी व अन्य गावांमधील पूर परिस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी पाठवलेले होते. एनडीआरएफ जवानांच्या धाडसी कार्याचे कौतुक गावातील लोकांकडून केले जात आहे.

सद्यस्थितीतील विसर्ग पाहता निरा व भीमा नदीपात्रातील सर्व कोल्हापूर बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. तरी काठावरील गावांना व नागरिकांना आपल्या स्तरावरून सतर्कतेचा इशारा देऊन आवश्यक तिथे रस्ते व वाहतूक बंद करण्यात यावी, जिथे पाणी पातळी वाढत आहे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी व्यवस्था कराव्या, अशा सूचना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केलेल्या होत्या. सदरच्या सूचनांची अंमलबजावणी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. कळंबोली येथील 40 कुटुंबातील 163 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. पळसमंडळ येथील 06 कुटुंबातील 28 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. बिजवडी येथील 10 कुटुंबातील 35 लोकांना जिल्हा परिषद शाळा व नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. कदमवाडी येथील 04 कुटुंबातील 20 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. तिरवंडी येथील 10 कुटुंबातील 63 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. उंबरे दहीगाव येथील 05 कुटुंबांतील 26 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, पुरजन्य परिस्थितीला सरकार योग्य ते पावले उचलून नागरिकांना सहकार्य करीत आहेत. माळशिरस तालुक्यातील महसूल प्रशासन अलर्ट असून आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे. नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासन आपल्या सोबत कायम असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button