कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या फळबागांचे आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; शिवस्वराज्य युवा संघटनेची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यांमध्ये सध्या हवामानातील बदलांमुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे फळबाग व पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांना आर्थिक मदत दोन लाख रुपये अशी मिळावी. कारण सोलापूर जिल्ह्यातील हवामानातील बदलांमुळे अवकाळी वादळी वाऱ्यामुळे ऊस, द्राक्ष, आंबा, शेवगा, खरीप हंगामाची भुईमूग, मका, बाजरी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. शेतकरी बांधूव आर्थिक मदत मिळावी आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई राज्य सरकारने तातडीने द्यावी. सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या फळबागांचे आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button