ताज्या बातम्यासामाजिक

तीन पिढयांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या – संचालक मानव संसाधन श्री. राजेंद्र पवार.

अकलूज (बारामती झटका)

महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन दि. ०१ ते ०६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०६ जून २०२५ रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षा विषयक ई-मेल व एमएमएस पाठविणे, भिंतपत्रके, चिन्नफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

मागील काही वर्षांमध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करुन व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताचे करु महावितरणचे ध्येय साकार’, हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि. ०१ ते ०६ जून २०२५ दरम्यान विद्युत सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. रविवार दि. ०१ जून रोजी सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात मॅरथॉन, रन फॉर सेफ्टी आयोजित करण्यात आली. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांचेसाठी विद्युत सुरक्षा प्रश्नामंजुषा जाहीर करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. महावितरण कार्यालय/रोहीत्र पेटी/आर.एम.यु./डिजिटल बोर्ड/शिडी गाडी/ उपकेंद्र/तक्रार निवारण केंद्र/ग्राहक सुविधा केंद्र/रहिवासी परिसर इ. ठिकाणी विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावण्यात आले असून समाज माध्यमांद्वोरे, रेडीओ, टिव्ही, प्रिंट मिडीया तसेच इतर माध्यमे वापरुन विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात आली आहे.

सोमवार दि. ०२ जून २०२५ रोजी राज्यातील ४ उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली. ग्राहकांना विद्युत सुरक्षा विषयी ई-मेल पाठविणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती, मंगळवार दि. ०३ व ०४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध/चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी / अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

दि. ०६ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वा. दरम्यान अकलूज विभागीय अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची महावितरण विभागीय कार्यालय, अकलूज चौक महावितरण विभाग कार्यालय अकलूज-महात्मा गांधी चौक-रामायण चौक-आंबेडकर चौक या मार्गावर विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. दि. ०६ जून रोजी सकाळी १०:०० ते १०:१५ वा. या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button