माळशिरस (बारामती झटका)
मांडकीसारख्या कायम दुष्काळ असणाऱ्या गावात जन्मलेले, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन शुन्यातून विश्व निर्माण केले ते युवा उद्योजक शत्रुघुनशेठ रणवरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय मांडकी येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण अकलूज येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण थोरले बंधू नोकरीच्यानिमित्ताने मुंबईत असल्याने त्यांच्याकडे मुंबई येथे झाले.
शत्रुघुनशेठ रणनवरे यांनी गरीबीचे अनेक चटके खाल्ले होते. गरीबी काय असते ती जवळून अनुभवली होती, त्यामुळे त्यांनी काही दिवस मुंबई येथे रोजीरोटीसाठी नोकरी केली. सुरवातीच्या काळात मुंबई येथे त्यांना खूप संघर्ष करावा लागला. टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, त्याप्रमाणे अनेक घाव सोसून त्यांनी आपला संघर्षमय प्रवास केला. दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय उभा करावा, हे नेहमी त्यांच्या डोक्यात सतावत होते. हीच प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबई येथे थोरले बंधू यांच्या सहकार्याने इलेक्ट्रीकल काँन्ट्रक्टर म्हणून छोटी मोठी कामे घेण्यास सुरवात केली. आज इलेक्ट्रीकल काँन्ट्रक्टर म्हणून मुंबई येथे त्यांनी चांगला जम बसविला आहे.
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, या उक्तीप्रमाणे व्यवसायाचा निमित्ताने मुंबईत जरी असले तरी जन्मभूमी मांडकी गावाच्या विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. गावातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, आणि सांस्कृतिक कार्यात तन-मन-धनाने मदत करतात. अशा उमद्या युवा उद्योजकास वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा. त्यांचे भावी आयुष्य सुख-समृध्दी, आरोग्यमय, आनंदमय जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng