मुख्य अभियंता बारामती परिमंडळ कार्यालयांत शेतकऱ्यांची वीज तोडू नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका.
बारामती ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस संजय देशमुख बारामती येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालय येथे प्रशासन अधिकारी महावीर शेंडगे यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन कट करण्याचे काम थांबवा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन अधिकाऱ्यांची चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत.
भाजपच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर यांच्यावतीने आपणास विनंती करण्यात येत आहे की, शेतकरी अगोदरच कोरोना महामारी, अवकाळी पाऊस, वारा आदीमुळे होरपळला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन तोडली जात आहेत. शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे लाईट बिल या स्थितीला तरी भरू शकत नाहीत. त्यामुळे आपण हे लाईट कनेक्शन तोडणी थांबवावी अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर यांच्यावतीने माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलेला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि मुख्य सचिव यांना देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng