पिलीव (बारामती झटका)
सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या आणि सद्गुरू श्री श्री रविशंकरजींच्या कृपाशीर्वादाने अडचणींवर मात करून “सेवा निसर्गाची उन्नती आपली” या ध्येयाने प्रेरित होऊन चेअरमन एन. शेषागिरीराव व व्हॉईस चेअरमन बाळासो कर्णवर-पाटील व सर्व संचालक मंडळाच्या योग्य नियंत्रणाखाली व सर्व अधिकारी खातेप्रमुख व कर्मचारी, कामगार यांच्या अथक परिश्रमातून सुस्थितीत सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लिमिटेड श्री श्रीनगर (राजेवाडी) कारखान्याने चालू हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला ॲडव्हान्स हफ्ता रुपये 2200 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे समजताच शेतकरी वर्गातून आनंदीआनंद व्यक्त केला जात असून शेतकरी वर्ग कारखान्याला धन्यवाद देत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng