Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी तुपाशी, शेतकरी राजा मात्र उपाशी – भिमराव भुसनर पाटील

सोलापूर (बारामती झटका)

राजकीय नेते मंडळींनी शेती उत्पादनावर तरी राजकारण करायला नको पण आपलं कोण ऐकतो. मी राजकीय नेते मंडळींपेक्षा शेतकरी बळीराजाला महत्व देतो. कारण वर्षभर राबराब राबुन शेतकरी राजा कष्टाने ऊसाचे पीक जोमाने आणतो. खुप स्वप्न बघतो. ह्यावर्षी ऊसाचे बील आले नवीन घर बांधु, नवीन मोटार सायकल घेऊ, मुलांना चांगले शिक्षण देऊ, पण सगळं उलटंच होतं. आयुष्यभर निराशा अवस्थेत जगतोय माझा शेतकरी बळीराजा.

महाराष्ट्रात कोल्हापूर आणि बारामती भागातील शेतकरी यांना चांगला दर मिळतोय ही आनंदाची बातमी आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्याचे चेअरमन मंडळी राजकीय हेवेदावे बाजुला ठेवुन एकत्र बसून सविस्तर चर्चा करुन शेतकरी बळीराजाचं मुंडकं मुरगळून मलिदा खातात. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बळीराजा अजून किती दिवस अन्याय सहन करणारं माहित नाही. मध्यंतरीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजु शेट्टी साहेब यांनी आवाज उठवली होता. त्यावेळी जर शेतकरी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते तर हे दिवस बदलले असते.

शेतकरी बळीराजाला आव्हान करतो. सध्या महाराष्ट्रात तुम्ही पाहताय नेते मंडळी आपल्या भल्यासाठी दररोज पक्ष बदलतात. मग आपणच का निष्ठा दाखवायची ? ज्या दिवशी तुम्ही नेते मंडळींना जाब विचाराल ना तेव्हा बदल घडायला सुरुवात होईल. भविष्यात शेतकरी राजाने एकजूट होऊन संघर्ष करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असं मत हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort