माळशिरस तालुक्यातील अवकाळी पावसाने केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीला लोकप्रतिनिधींची धावाधाव…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नुकसान भागांचा दौरा तर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या फोनवरून प्रशासनाला सूचना..
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील अवकाळी पावसाने केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीला लोकप्रतिनिधींची धावाधाव झालेली आहे. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते लोकसभेचे उमेदवार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू आहेत. अचानक अवकाळी पावसाची बातमी समजल्यानंतर माळशिरस तालुक्याचे तहसीलदार व कृषी विभाग यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दिले. जरी सोलापूर येथे धावपळ असली तरी, त्यांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले आहेत. कारण, माळशिरस तालुक्यातील जनतेने दिलेले प्रेम ते कधीही विसरू शकत नाहीत. तर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित पिकांची पाहणी करून प्रशासनांना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, अशा सक्त सूचना केलेले आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानूसार नातेपुतेसह परीसरात अवकाळी पावसाने शूक्रवारी दूपारी २.३० दरम्यान वीजाच्या कडकडासह, तूफान वाऱ्यासह जोरदार पावसाला सूरूवात केली. गाराही काही प्रमाणात पडत होत्या. यामूळे शेतातील काढणील्या आलेल्या पिकासह शेतकरी वर्गाची धांदल उडाली. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू, द्राक्षे, मका तसेच आंब्याच्या बागांनाही मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी आंबे गळती होऊन आंबा उत्पादक, द्राक्षे उत्पादक तसेच फळबागांचे मोठे नूकसान झाले असून अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.
जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे, दहीगांव ता. माळशिरस येथील बाळासाहेब कदम यांचा जनावरांचा गोठा, शेखर शिंदे यांचे राहते घर, तानाजी कदम यांच्या गाईच्या अंगावर दारातील वडाचे झाड पडल्याने गाई झाडाखाली दबली जाऊण जागीच गतप्राण झाली, तसेच जयसिंग कदम यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. वाऱ्यामुळे गोठा उडून गेला. तसेच वादळी वाऱ्याने नातेपुते येथील बापू कूंभार यांच्या घरावरील पञे उडाले असून त्याचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. तसेच अक्षय कोथमिरे यांनी शेळ्या, मेंढ्यासाठी बांधलेले पत्र्याचे शेड उडून गेल्याने मोठे नूकसान झाले. परीसरात अशा अनेक घटना घडल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

तसेच वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून नातेपुते, दहीगांव, शेरेवाडी, निरा उजवा कालव्याशेजारी मोठ्या प्रमाणात पोल पडले असून वीजेच्या तारा तूटल्या असून मेन लाईनही नादुरूस्त असून विज सूरळीत होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे वीज वितरणचे प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
मांडवे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे अर्जुन दुधाळ व बंडा सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले. दहीगांव-गूरसाळे रोडवर ओढ्यालगत जोरदार वाऱ्यामुळे एक बाभळीचे मोठे झाड पडल्यामूळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळानंतर ते झाड जेसीबीच्या बाजूला करुन वाहतूक सूरळीत करण्यात आली.
माळशिरस तालूक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे घरे, जनावरांचे गोठे, दगावलेली जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. त्या ठिकाणचे पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत तत्काळ दिली जाईल, – सुरेश शेजूळ, तहसिलदार, माळशिरस
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.