पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट…

फलटण (बारामती झटका)
काल दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्याच पार्श्वभूमीवर कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
भेटी दरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु, आता समाजातील मुलामुलींची व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुलामुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकुन, बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. तर, शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु, महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे, हि विनंती केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.