ताज्या बातम्याराजकारण

स्वत:च्या भवितव्यासाठी मोहीते पाटील तुतारी सोबत असतील तर गावाच्या भवितव्यासाठी माझं गाव निंबाळकरांसोबत – सरपंच राणीताई गोरड

दुष्काळी भागाची जीवनदायिनी निरा देवधर योजनेचे जनक जलनायक रणजितसिंह नाईक निबांळकर यांना दुष्काळी गावांचा एखमुखी पाठींबा

पिलीव (बारामती झटका) विश्वजीत गोरड यांजकडून

माळशिरस तालुक्यातील बचेरी, सुळेवाडी, शिंगोर्णी, गारवाड, जळभावीसह बारा गावे कायम दुष्काळी आहेत. गेली चाळीस वर्षे या गावातील जनता मोहीते पाटील यांना पाणी देतील या आशेने निवडुन देते. तालुक्यात कोणताही उमेदवार असो मोहीते पाटील यांच्या आदेशानुसार जनता निवडुन देते. परंतु, मोहीते पाटील परिवाराला दुष्काळी भागाचे गेल्या चाळीस वर्षात कसलेच सोयर सुतक नाही. मतदानाच्या वेगवेगळी आश्वासने दिली जातात. आज पाणी येईल, उद्या पाणी येईल, या भोळया आशेवर आजही भोळीभाबडी जनता मोहीते पाटील यांच्याकडे टक लाऊन पाहते. परंतु, प्रत्येक वेळी मोहीते पाटील यांनी दुष्काळी भागाचा विश्वासघात केला आहे.

पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या दुष्काळी भागाला पाणी मिळावे, याकरिता रखरखत्या उन्हात अधिकारी वर्गासोबत सर्वे केला आणि ही गावे योजनेत समाविष्ट करण्याचे खुप मोठे काम केले. यामुळे दुष्काळाने पिचलेल्या लोकांसाठी पाच वर्षात गावे समाविष्ट केल्याबद्दल जलनायक रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देवदुत वाटत आहेत. तर चाळीस वर्ष दुष्काळी भागाची दयनीय अवस्था केल्याबद्दल मोहीते पाटील व्हीलन ठरत आहेत. अजुन पाच वर्ष दिले तर खासदार साहेब समाविष्ट केलेल्या गावासाठी निधीची तरतुद करतील म्हणुन दुष्काळी भागासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार होणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा मागील चाळीस वर्षांसारखे पाण्यावाचुन वंचित रहावे लागेल. म्हणुन माझ्या गावच्या कल्याणासाठी, उज्वल भवितव्यासाठी पुर्ण ताकतीने मी व माझ्या गावासह दुष्काळी बारा गावे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंभीरपणे असल्याचे प्रतिपादन बचेरी गावच्या कर्तव्यदक्ष महिला सरपंच राणी विश्वजीत गोरड यांनी म्हटले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button