डॉ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांना आधार सोशल फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार.
अकलूज (बारामती झटका)
राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हा चेअरमन डॉ बाळासाहेब कर्णवर पाटील यांना बेळगांवच्या आधार सोशल फाउंडेशनचा आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्कार जाहिर झाला असून तो रविवार दि . ११ जून रोजी देण्यात आला.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230613-WA0004.jpg)
डॉ कर्णवर पाटील हे श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या माध्यमातून समाजकारण , उद्योग , पर्यावरण , योगा आदी क्षेत्रात कार्यरत आहेत . मुळचे माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे रहिवाशी असलेल्या डॉ कर्णवर पाटील यांनी सन २०१२ मध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील माळरानावर चेअरमन शेषगिरीराव व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने सदगुरु श्री श्री साखर कारखान्याची निर्मिती करुन हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230613-WA0005-768x1024.jpg)
शेतीनिष्ठ असलेल्या डॉ कर्णवर पाटील यांनी शेतीवर आधारित निरनिराळे प्रयोग करुन उत्तम शेती , उत्तम उद्योग व समाजकार्याद्वारे जनजागृती करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी त्यांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230613-WA0007-723x1024.jpg)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng