बारामती झटका इफेक्ट : माळशिरस शहरातून माऊलींच्या पालखीचा प्रवास सुखकर होणार..
माळशिरस शहरातून पालखी मुक्काम ठिकाणी खड्ड्यात आदळत आपटत प्रवास करावा लागणार…अशा बातमीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
माळशिरस (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी-पुणे-लोणंद-फलटण मार्गे माळशिरस तालुक्यात प्रवेश करण्याकरता थोडे दिवस राहिलेले असताना माळशिरस शहरातील राजमाता अहिल्यादेवी चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल रस्ता खड्डेयुक्त झालेला होता. माळशिरस शहरातून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी खड्ड्यात आदळत आपटत प्रवास करावा लागणार, अशा मथळ्याची बातमीचे वृत्त बारामती झटका वेब पोर्टल यांनी प्रसिद्ध केलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन खड्ड्यातील रस्ता दुरुस्त केलेला असल्याने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रवास माळशिरस शहरातून सुखकर होणार असल्याने भाविक व वाहनधारक यांच्यामधून बारामती झटका वृत्ताचे अभिनंदन केले जात आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023_0619_080040.png)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023_0619_080028.png)
बारामती झटका वेब पोर्टल यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहे. माळशिरस शहरात पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग जात असून माळशिरस शहरात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना खड्ड्यात हिसके देत प्रवास करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचा दौरा केलेला होता. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा दौरा करीत असताना माळशिरसवरून खड्ड्याच्या रस्त्याने जाण्याऐवजी चांगल्या रस्त्याने अकलूजकडे वळले होते. त्यामुळे माळशिरस शहरापासून मुक्कामाच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याचे अतिक्रमण तसेच राहिले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वैष्णव व भाविक भक्तांची गर्दी असते. अनेक लोक दिंडीमध्ये व दिंडी व्यतिरिक्त पाई चालत असतात. भाविकांना चालताना रस्त्यामध्ये अथवा चालताना अडचण होऊ नये यासाठी अडचणी दूर केल्या जातात. मात्र, माळशिरस शहरापासून पालखी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत रस्त्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात असताना आदळत आपटत पालखीला प्रवास करावा लागून भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर डागडुजी व मलमपट्टी लवकर करावी, अशी भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023_0619_080015.png)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा चिलार झाडांचे रस्त्यावर अच्छादन झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे कधी उघडणार ? का वाहनधारक व भाविकांच्या डोळ्यात चिलाराच्या फाट्याचा चपकार लागून डोळा बाद झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार ?, असा सवाल वाहनधारक व भाविकांमधून उपस्थित केला जात आहे. अशा मथळ्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
बारामती झटका वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून काम करून घेतलेले आहे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी शनिवार व रविवारी दोन दिवसात रस्ता चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे. शनिवार रविवारी अनेकजण आपापल्या गावी गेलेले असणार आहेत. दोन दिवसात चमत्कार व्हावा अशा पद्धतीने माळशिरस शहरात कंपनीने रस्ता चकचकीत व गुळगुळीत केलेला असल्याने स्थानिक, नागरिक, वाहनधारक व भावीक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023_0619_075929.png)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng