माण-खटाव दुष्काळ जाहीर करावा – राष्ट्रीय काँग्रेस

माण-खटाव (बारामती झटका)
ऑगस्ट महिना संपाला तरी माण व खटाव तालुक्यात अजूनही पावसाची हजेरी नाही. सरकारला जागे करण्यासाठी व दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या चूकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले भाव, बेरोजगारीचा दर प्रचंड वाढलेला असतानाही वेगवेगळ्या सरळ सेवा भरती परिक्षांमध्ये होणारा गोंधळ, कांद्यावर लावण्यात आलेला निर्यात शुल्क याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. कुणालजी राऊत व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या व माण-खटाव युवक काँग्रेसच्यावतीने दहीवडी येथे दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी ११ वा. दहीवडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी उदय भानू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजित देशमुख, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्रशात ओगले, सहप्रभारी एहसान खान, सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, प्रदेश सरचिटणीस तारीख बागवान, प्रदेश सहसचिव निलेश काटे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. भोसले, किसान काँग्रेस अध्यक्ष विश्वंभर बाबर सर, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, महिला अध्यक्षा नकुसाताई जाधव, प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, प्रदेश सचिव हृषिकेश ताटे, जिल्हाउपाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, जिल्हा सचिव सचिन गोरड, कराड दक्षिण अध्यक्ष दिग्विजय पाटील, माण-खटाव विधानसभा उपाध्यक्ष पंकज पोळ, खटाव तालुका उपाध्यक्ष सलमान नदाफ, अनुसूचित जाती अध्यक्ष विजय बनसोडे अनिल लोखंडे, नगरसेवक विकास गोंजारी, शिवाजी यादव, दाऊद मुल्ला उपस्थिती राहणार आहेत. तरी माण खटावच्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng