हर घर तिरंगा घर घर तिरंगा शेतकऱ्यांची एफआरपी मिळालीच पाहिजे
माळशिरस (बारामती झटका)
शेतकऱ्यांचे दैवत खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेले शंकर सहकारी साखर कारखान्याची थकीत एफआरपी, कामगारांचे वेतन मिळालेच पाहिजे, अशा आशयाचे निवेदन शंकर सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख यांनी स्वीकारले आहे.
दि. 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व कामगारांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी सकाळी 11 वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी व कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दत्ता भोसले यांनी केले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-06-20-at-5.20.17-PM-1024x819-1.jpeg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/08/Screenshot_2022_0714_213451.png)
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/08/Screenshot_2022_0707_163608.png)