श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हॅलोजन चोरण्याचे प्रमाण वाढले…

खुडूस (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण झालेले आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल तयार केलेले आहेत. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी बायपास रस्ते आहेत. महामार्ग तयार करीत असताना महामार्गावर उड्डाणपुलाच्या ठिकाणी रात्री अपरात्री उजेड असावा, यासाठी दुतर्फा लाईटची सोय केलेली आहे.
माळशिरस वेळापूर दरम्यान खुडूस हद्दीमधील उड्डाणपुलाच्या ठिकाणी बसवलेले पथदिवे हॅलोजन मर्कुरी दिवे चोरीस गेलेले आहेत. चोरी करणाऱ्या चोराला सुद्धा लाज वाटली पाहिजे आपण कशाची चोरी करतोय. पालखी महामार्गावरून रात्रंदिवस प्रवास सुरू असतो. रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा फायदा होतो. पथदिवे चोरून नेणाऱ्यांचा किती फायदा झाला हा संशोधनाचा भाग आहे मात्र, असे गैरकृत्य करणाऱ्या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
पथदिवे बसवित असताना उंचावर बसविले पाहिजेत व सदरच्या ठिकाणी करंट चालू ठेवावा म्हणजे चोर पकडणे सोपे होईल. ज्यावेळेस पथदिव्यांची दुरुस्ती असते त्या वेळेला लाईट बंद करून दुरुस्ती करावी म्हणजे अनर्थ टळेल आणि चोर सापडेल. यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक व भाविकभक्तांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.