‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’, याचा प्रत्यय, राणंद पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना..

आंधळी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णामाईचे पाणी पूजन ना. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते.
राणंद (बारामती झटका)
राजकारणात अनेक नेते व कार्यकर्ते बोलघेवडे असतात निवडणुकीत आश्वासनाची खैरात असते मात्र, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचा मानबिंदू दुष्काळी जनतेचा तारणहार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण केलेला असल्याने बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याचा प्रत्यय आल्याने राणंद पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, अशी परिस्थिती ऐन उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील व माण-खटाव चे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जलनायक ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या शुभ हस्ते सोहळा वचनपूर्तीचा गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूरची वाढीव योजना आंधळी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत पहिल्यांदाच राणंद तलावात आणलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचे पूजन गुरुवार दि. 15 मे 2025 रोजी दुपारी 03 वाजता राणंद तलाव जलपूजन सोहळा संपन्न होत आहे.

आंधळी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत “कृष्णामाई” चे पूजन नामदार “राधाकृष्ण” यांच्या शुभहस्ते होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.