अक्षता पडल्या अन् सकाळी नवरीला देवाज्ञा…आनंदाच्या सोहळ्यानंतर सकाळी गावावर पसरली शोककळा

वाघोली (बारामती झटका)
जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागल्याची दुःखद घटना घडली आहे.
बाभुळगाव, (ता. माळशिरस) येथे पराडे-गळगुंडे या परिवारांत हृदय पिळवून टाकणारी घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीर हरिदास पराडे यांचे १३ मे रोजी घोटी, (ता. माढा) येतील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा निरा-नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता.
लग्नानंतर नववधू सासरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान नववधू वर काळाने झडप घातली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.