हुंडा – एक अनिष्ट प्रथा, फलटणचे बोंद्रे दांपत्य करणार समाज प्रबोधन.

मराठा समाजातील विवाह सोहळ्यासाठी करणार आदर्श आचारसंहिता.
सातारा (बारामती झटका)
आज मराठा समाजात उंचावलेला आर्थिक स्थर आणि शाही विवाह सोहळ्यात त्याचे होणारे प्रदर्शन पुढील वैवाहिक सुखी संसारासाठी ग्रहण म्हणून उभे राहत आहे.
हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा असेल तरी रोख हुंडा न घेता मौल्यवान वस्तूंच्या बदल्यात अप्रत्यक्षरीता मुलींकडून वस्तू रुपी हुंडा घेतला जात आहे. हे डाम डोलाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात आपण पाहत आहोत. वधू-वरांच्या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा समाजात दाखवून देण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे. हे आपण शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पाहत आहोत. आपल्या उंचावलेल्या आर्थिक जीवनमानाची या विवाह सोहळ्यात आपल्या रीतीनुसार धार्मिक संस्कारानुसार आणि धार्मिक विधी यांचे विस्मरण होऊन या अशा गोष्टींचे स्तोम माजलेले आपण विवाह सोहळ्यात पाहत आहोत.
आज पुण्यातील एका वैष्णवीच्या दुर्दैवि कहानीमुळे महाराष्ट्राला मात्र आता अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. खरे तर या अगोदर कित्येक वैष्णवी समाजाच्या नजरेसमोर आल्या आहेत. तरीसुद्धा अजूनही काही वधू पिते आपल्या वैष्णवीच्या सुखी संसारासाठी आणि समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा शाही डामडौल करण्याचा थाट मांडत असतात.
फलटण येथील सौ. मनीषा राजेंद्र बोंद्रे आणि राजेंद्र बाबुराव बोंद्रे. हे तुळजा वधु वर सूचक या समाज हितासाठी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत सौ. मनीषा राजेंद्र बोंद्रे यांनी मराठा समाजातील कित्येक लग्न जमवून त्यांना समुपदेशन करून सुखी संसार उभे केले आहेत. सामाजिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या सातारच्या सभापती बळीभाऊ कदम यांच्या त्या सर्वात लहान कन्या. विवाहनंतर फलटण येथे सासरी रमल्या पण वडिलांच्या सामाजिक सेवेचा वसा त्यांनी सासरी सुद्धा उमटवला. आहे कित्येक सुखी संसार उभे केल्यानंतर वैष्णवीच्या दुर्दैवी कहानी नंतर आत्मचिंतन करून त्यांनी सातारा जिल्ह्यात मराठा समाजामध्ये मौल्यवान वस्तूंच्या रूपात आणि शाही विवाह सोहळ्याच्या थाटामाटात होणाऱ्या कार्यक्रमास गालबोट लागता कामा नये यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांनी प्रबोधन करण्याचे ठरवले असून या विवाह सोहळ्यासाठी आणि समाजातील अजून सुखी संसार करू इच्छिणाऱ्या वैष्णवी सारख्या कन्यांसाठी त्यांनी समाजात प्रबोधन करण्याचे ठरवले असून विवाह सोहळ्यासाठी एक आचारसंहिताच समाजाच्या समोर मांडण्याचे ठरवले आहे.
आज फलटण तालुक्यात जर पाहिलं तर मराठा समाजामध्ये सुमारे 3000 मुलं अजूनही लग्नाचे वय निघून गेले तरी अविवाहित आहेत. मुली उच्चशिक्षित आहेत उच्चशिक्षित मुलांची संख्या कमी होते आहे.उच्चशिक्षित असून शेती करणारा मुलगा असेल तर मुलीकडून नकार येतोय.प्रत्येक मुलीला पुणे मुंबई सारखंच शहरांमध्ये संसार करावासा थाटावा वाटतंय. उत्तम शेती करणारे उत्तम व्यवसाय करणाऱ्या आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या होतकरू तरुणांची संख्या सातारा जिल्ह्यात पण मराठा समाजात कमी नाही परंतु हल्ली उच्चशिक्षित शिक्षण घेतलेल्या मुलींना शहराची ओढ लागू राहिली आहे. तर आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या घरातील मुलांच्या आणि आई-वडिलांच्या भावी सुनेबाबत अपेक्षा काही वेगळ्याच असतात. आमच्या तोलामोलाच स्थळ मिळावं. आमच्या तोला मोलाच्या घराण्यातील मुलगी असावी. आणि आमच्या मुलाचं लग्न हे त्यांनी थाटामाटात संपन्न करून समाजामध्ये आमच्या घराण्याची प्रतिष्ठा कशी वाढेल. हा दृष्टिकोन लग्न ठरवताना बऱ्याच ठिकाणी त्यांना दिसून येत आहे. यासाठी समाजात विस्कळीत होत असणारी पुढील भावी पिढीची संसाराची घडी उत्तम असावी .आणि वधू-वरांच्या पित्यांनी त्यांच्या सुखी संसाराच्या बाबत मापक अपेक्षा ठेवून डामडोलाने होणाऱ्या शाही विवाह सोहळ्यांना फाटा देऊन भविष्यात आर्थिक स्थिती उत्तम कशी राहील याबाबतचा विचार करून हे विवाह सोहळे आपल्या संस्कृतीनुसार पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधीला महत्त्व देऊन कसे संपन्न करता येतील याबाबत आचारसंहिता तयार करून संपूर्ण सातारा जिल्ह्यात याबाबत प्रबोधन करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे.
सातारा जिल्ह्यातील सामाजिक धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा ज्येष्ठ विचारवंतांचा सल्ला घेऊन लवकरच याबाबत प्रबोधनाला सुरुवात करणार आहेत यासाठी या बोंद्रे दांपत्याला ज्येष्ठ विचारवंतांच्या मार्गदर्शनाची गरज ही लाभणार आहे. असेही त्यांनी समाजामध्ये मार्गदर्शनासाठी आवाहन केले आहे . त्यामुळे समाजातील अशा समाजप्रबोधनाची आवड असणारी आणि समाजाबद्दल कळवळ आणि आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून समाजासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींनी समाजाच्या जडणघडणीसाठी संपर्क करून एकजुटीने काम करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तुळजा वधुवर सुचक च्या माध्यमातून त्यांना विवाह सोहळ्याच्या अगोदर विवाह निश्चिती पासून ते विवाह संपन्न होईपर्यंत आणि विवाह संपन्न झाल्यानंतर सुद्धा काय परिस्थिती असते याचा त्यांना आजपर्यंत त्यांनी स्वतः मध्यस्थी करून विवाह निश्चित केल्यामुळे बरचसा प्रत्यक्षदर्शी अनुभव समोर असल्याने. समाजातील वास्तव स्थितीचे अवलोकन करून समाजासाठी एक पाऊल का उचलू नये या भावनेतून आपल्या कार्यास या दांपत्याने सुरुवात केली आहे. निश्चितच सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ विचारवंत त्यांना मार्गदर्शन करतील अशी आशा त्यांना आहे. चला तर आपण सर्वजण याबाबत योग्य आचारसंहितेचे नियमन करून प्रबोधन करूया. आणि भावी वैष्णवींच्या सुखी संसारासाठी एक सकारात्मक पाऊल उचलू या.
सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक विचारवंतांनी आम्हास मार्गदर्शन करावे ही विनंती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.