इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण जाहीर; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई (बारामती झटका)
इस्लामपूर शहराचे “ईश्वरपूर” असे नामकरण करावे, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर आज पूर्णत्वास पोहोचली आहे. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयामागे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केले गेले असून, अखेर त्याला यश आले आहे. नामांतराचा निर्णय म्हणजे केवळ एका शहराच्या नावाचा बदल नाही, तर त्या ठिकाणच्या जनतेच्या अस्मितेचा व सन्मानाचा विजय आहे.

ईश्वरपूरचे नामकरण जाहीर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



