भाजपच्या कार्यकर्त्याचा संघर्ष न्यारा असतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही, हा आमचा इतिहास आहे – लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते

सातशे कार्यकर्त्यांच्या हत्या बंगालमध्ये झाल्या, तिथल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे हे यश आहे…
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पवित्र भूमीत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांच्यासह भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे आभार मानतो – भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार रामभाऊ सातपुते…
अकलूज (बारामती झटका)
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये भाजपचे सरकार आले आहे. पश्चिम बंगाल, ज्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली अशा शामाप्रसाद मुखर्जी यांची ही भूमी आहे. त्या भूमीवरती पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 700 कार्यकर्त्यांच्या हत्या बंगालमध्ये झाल्या. विचारांसाठी, देशासाठी तिथल्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. त्यांच्याकडून मिळालेले हे यश आहे. ज्या बंगालमध्ये कधीकाळी म्हटलं जायचं, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत ममता बॅनर्जी संपणार नाहीत. त्या पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींना घालवायचंं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे.


भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा संघर्ष हा न्यारा असतो. आणि भाजपचा कार्यकर्ता कुणाच्याही बापाला घाबरत नाही, हा आमचा इतिहास आहे. आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, त्या संविधानाच्या मार्गाने सगळ्यांना चालावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये गोरगरीब कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, भंगार मध्ये पतसंस्था, बँका मोडून ममता बॅनर्जींनी खाल्ल्या. त्यांचा अंत करायचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. येत्या काळात त्या ठिकाणी या देशाच्या कानाकोपऱ्यात कमळ फुलवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना कामाला लागावं लागेल. आज अकलूजच्या सदुभाऊ चौकात मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो पश्चिम बंगालमधील जुलमी राजवट उध्वस्त करून टाकलीय. त्यामुळे इथला कार्यकर्ता सुद्धा स्वाभिमानाने संघर्ष करेल. बंगालच्या कार्यकर्त्याकडून प्रेरणा घेतोय. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, इथल्या कार्यकर्त्यांना बंगाल मधल्या आपल्या ७०० कार्यकर्त्यांनी बलिदान देऊन भारतीय जनता पार्टी जिंकवली आहे.


पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी व्हायची, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्या ठिकाणी मानले जात नव्हते. अशा परिस्थितीत तिथला कार्यकर्ता ताकदीने उभा राहिला. आज दोनशे सीट पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. आसाम मध्ये आपला विजय झालाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही संघर्षाने उभा राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे मी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी पश्चिम बंगाल पासून प्रेरणा घ्यायची. आणि इथल्या सगळ्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा घ्यायची आहे. अकलूज मध्ये आपला पराभव झाल्यानंतर काहीजण मोठेपणा मिरवत होते. परंतु आम्ही पंधरा वर्षे संघर्ष केला आहे आणि भाजपची सत्ता आली. या ठिकाणी सुद्धा आम्ही ताकतीने संघर्ष करू. कुठल्याही परिणामांना न घाबरता भारतीय जनता पार्टीचा झेंडा ताकदीने फडकवू हा आमचा संकल्प आहे.



अकलूजच्या या चौकातून आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि पश्चिम बंगालच्या करोडो कार्यकर्त्यांनी जो संघर्ष केलाय, जे बलिदान दिलंय, ज्यांच्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस पहायला मिळतोय, त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुका भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या अकलूज येथील सदुभाऊ चौकातील विजय उत्सवादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले..


यावेळी गणपत तात्या वाघमोडे, सोपानकाका नारनवर, प्रकाशबापू पाटील, श्री. आप्पासाहेब देशमुख, श्री. बाजीराव काटकर, अकलूज शहर अध्यक्ष श्री. महादेव कावळे, तालूका संघटक डॉ. श्री. निलेश ननवरे, श्री. संजय देशमुख, श्री. हरिभाऊ पालवे, श्री. नितीन मोहिते सरचिटणीस श्री. सचिन शिंदे, श्री. अमरसिह देशमूख, श्री. अमित टिळेकर, श्री. विक्रमसिंह देशमुख अकलूज नगरपरिषद, श्री. राहुल लोढे नगरसेवक, श्री. महेश शिंदे, श्री. नागेश गुळवे अकलूज सरचिटणीस, श्री. अमोल माने, श्री. संतोष टकले, श्री. संजय दोशी, श्री. अजित गांधी, श्री. अशोक गायकवाड, संतोष वाघमोडे अकलूज अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, श्री. अमर शेख, श्री. भैय्या चंदनशिवे, संजय एकतपुरे, श्री. सुहास गायकवाड, श्री. दाजी सदाफुले, श्री. महावीर खंडागळे, श्री. लहूजी काबंळे, श्री. संजय खुडे, श्री. सिद्धार्थ गरीबदास गायकवाड, श्री. शिवचरण खंडागळे, श्री. कुणाल होनमाने, श्री. जतीन वायदंडे, श्री. भैय्या ससाणे, श्री. रोहन लोहार, श्री. गणेश पवार, श्री. अविनाश वाईकर, श्री. श्रीकांत दोरकरे, श्री. सोमनाथ परदेशीं, श्री. श्रवण खडके, श्री. शाबास काझी, सौ. दिपाली देशमुख, नगरसेविका सौ. दिपाली वाघमोडे, सौ. जयश्री एकतपुरे, सौ. कोमल भोसले, श्री. किसन शिंदे, श्री. किरण उर्फ बाबा गायकवाड, श्री. गरीबदास गायकवाड, श्री. नागेश भाऊ गुळवे, ॲड. राहुल लवटे, रणजीत ठवरे, आदींसह तालुक्यातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..


सदुभाऊ चौकात भाजपचे कार्यकर्ते एकत्र जमलेले होते भारत माता की जय, वंदे मातरम, मोदी है तो मुमकिन है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेलेला होता. फटाक्यांची आतिषबाजी, हलग्यांचा कडकडाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांचा विजयाचा आनंदोत्सव एकमेकांना लाडू भरवत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलेला आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



