अनारोग्यकारक जीवनशैली व तणावामुळे हृदयविकारात वाढ

मुंबई (बारामती झटका)

भारतात विशेषतः तरुण वयोगटांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंदाजानुसार दरवर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू होण्याची ७ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते सीव्हीडीमुळे होणारे ८६ टक्के मृत्यू प्रतिबंध आणि उपचारांद्वारे टाळता येऊ शकतात. हे पाहता अनेक जीवनशैली पद्धतींचा कार्डियोव्हस्कुलर (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत) आरोग्यावर परिणाम होतो.

लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सडन कार्डियाक अरेस्ट हा हार्ट अटॅक पेक्षा वेगळा आहे, जे रुग्णांच्या एक किंवा अधिक हृदयांच्या धमण्या ब्लॉक झाल्यामुळे होते. कार्डियाक अरेस्ट सामान्यतः हृदयाच्या असामान्य लयीमुळे होतो, जो आपल्या हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीम योग्यरीत्या कार्य करत नसल्यास उद्भवतो. पण अॅक्युट हार्ट अटॅक कधीकधी अधिक ताण निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.

अनारोग्य टाळा
धूम्रपानसारखी अनारोग्यकारक जीवनशैली, शारीरिक व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि मादक पदार्थांचे व्यसन हे जोखीम घटक असू शकतात. यासह वय (पुरुषांसाठी ४५ वर्ष आणि महिलांसाठी ५५ वर्षांपेक्षा जास्त) आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा पूर्वीच्या हृदयविकाराचा इतिहास देखील संभाव्य कारणे असू शकतात. दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यक्तीने दररोज वेगवान चालले पाहिजे आणि त्यानंतर सायकलिंग, पोहणे व आवडीनुसार जॉगिंग सारखे व्यायाम केले पाहिजेत. हे व्यायाम हृदयासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात. यासह योग्य पोषण व दररोज पुरेशी झोप ज्यामध्ये दिवसातून ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये धमाल आनंद घेतल्याने तणाव दूर होऊ शकतो आणि तणावाची पातळी कमी होऊ शकते, म्हणून जीवनात असे आनंद घेण्याला प्राधान्य द्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती
Next articleमाळशिरस येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ चे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here