मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांना तात्काळ कार्यमुक्त करा…

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ‘बदली’वरुन गोंधळ
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने – देशमुख यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी दि. 30/05/2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्यामुळे जिल्हा परिषद सोलापूर मध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी फुलली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने – देशमुख यांची अक्कलकोटला बदली झाली आहे. अशात मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीने जोर धरला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार 30 व 31 मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहेत.
स्वीय सहाय्यकावर रोष…
जिल्हा परिषदेत घडलेल्या अनेक प्रकारातूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुधाकर माने देशमुख यांच्यावर आता आरोप होत आहेत. वास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नदाफ व मल्लिकार्जुन तलवार हे दोन कार्यालयीन कामकाज करणारे दोन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी दिली तर सीईओचे कामकाज जनव्यापक होईल, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कालावधीत देशमुख यांची नियुक्ती झाली. बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हातामध्ये माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांच्या प्रशासकीय कालावधीतील चौकशी करावी, असे पत्र दिलेले होते. सदरचे पत्र स्वीय सहाय्यक लक्ष्मी दर्शनाचा आधार घेत यांनी रेकॉर्डवर येऊ दिले नाही. लवकरच त्या पत्रासह मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व तत्कालीन स्वीय सहाय्यक यांच्या विरोधात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे रीतसर तक्रार करून सदरच्या तक्रारीची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यावेळीच ते वादग्रस्त ठरले होते. यावेळी देशमुख यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे मनीषा आव्हाळे यांनी थोडे दिवस कामकाज पाहू असे म्हणून वेळ ढकलली. पण देशमुख यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे काय झाले ? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर सीईओ म्हणून जंगम यांनी पदभार घेतला. या काळात अनेक गंभीर तक्रारी आल्या. वेगवेगळ्या विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगणमत करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत फाईल जाऊ न देणारा मास्टर माईंड जिल्हा परिषदेतून हद्दपार झालेला आहे.
फायली होत आहेत गायब…
शासनाच्या आदेशानंतर सीईओ जंगम यांनी ई-फायलिंग सिस्टीम सुरु केली आहे. पण तरीही चक्क सीईओकडे येणाऱ्या फायली गायब होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या फायली कोण गायब करीत आहे, याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. सीईओ कार्यालयातील महत्त्वाची माहिती बाहेर जाते. सार्वजनिक ठिकाणी ही माहिती कोणाकडून बाहेर जात आहे, याचा शोध घ्यावा अशीही मागणी कर्मचाऱ्यातून केली जात आहे.
सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कार्याची झलक दाखवत पाच वर्षापासून अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकापासून करावी याही चर्चेला जोर धरला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.