लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, मतदान, मतमोजणी कधी…

दिल्ली (बारामती झटका)
देशातील १८ व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर ४ जूनला मतमोजणी पार पडेल. देशात ७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. तर आता या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. १६ जून २०२४ ला भारताच्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून देण्यात आली. महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
◾पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
तसेच मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य या सहा मतदारसंघांचीही निवडणूक या दिवशीच होणार आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगड आणि आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये चार टप्प्यांत, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.