ताज्या बातम्या
मौजे अंकोली येथील बायडाबई रणदिवे यांचे दीर्घ आजाराने निधन
दैनिक संचारचे पत्रकार दशरथ रणदिवे यांना मातृशोक
अंकोली (बारामती झटका)
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रहिवाशी बायडाबई भारत रणदिवे यांचे काल बुधवारी सायंकाळी सव्वा नऊ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. दैनिक संचारचे पत्रकार दशरथ रणदिवे यांच्या त्या मातोश्री होत्या. मृत्यू समयी त्या ६७ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
स्व. बायडाबाई भारत रणदिवे यांच्या आत्म्यास शांती लाभो व रणदिवे परिवारास या दु:खातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.